शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पीआय राजपूत, पीएसआय वाकडेसह नऊ कर्मचाऱ्यांना महासंचालक सन्मानचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 19:24 IST

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २०२३ वर्षातील पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले आहेत. राज्यातील ८०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे पदक मिळाले आहे.

चंद्रपूर : जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील तत्कालीन पोलिस निरीक्षक, तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक, तसेच दोन सहायक पोलिस निरीक्षक व नऊ पोलिस हवालदारांना उल्लेखनिय कामगीरीबद्दल पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यामुळे चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाचा गौरव वाढला आहे. १ मे महाराष्ट्र दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २०२३ वर्षातील पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले आहेत. राज्यातील ८०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे पदक मिळाले आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्हा पोलिस दलातील १३ जणांचा समावेश आहे. यापैकी सन २०२३ मध्ये चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून असलेले तत्कालीन ठाणेदार सतीश सिंग रणजितसिंह राजपूत, तसेच चंद्रपूर भरोसा सेलमधील तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक अश्विनी शामराव वाकडे (झाडे) यांनाही हे सन्मानचिन्ह मिळाले आहे. सद्य:स्थितीत या दोघांचीही जिल्हा बदली झाली आहे. यासोबतच सपो उपनिरीक्षक राजेंद्र किसान तुमसरे, सपो उपनिरीक्षक गुलाब रामचंद्र बल्की, तसेच पोलिस हवालदार विक्रम व्यंकटराव नवरखेडे, नईमखान ताजमहम्मद खान, शकील गुलाब शेख, लक्ष्मण नानाजी धांडे, अर्जुन भिवा मडावी, नागो लहानुजी दाहागांवकर, गणेश विष्णूजी मेश्राम, मंगेश वामनराव मत्ते, महिंद्र खुशालराव बेसरकर यांनाही पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाले आहे. यामुळे चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाचा गौरव वाढला आहे.कुणाला मिळते पदकमहाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय, प्रशंसनीय सेवेबद्दल महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळत असते. चंद्रपुरातील वरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियुक्तीपासून आजपर्यंत केलेल्या कामगिरीच्या आधारावर हे पदक जाहीर झाले आहेत. पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांनी भरोसा सेलमध्ये जिल्ह्यात गौरवपूर्ण कामगिरी करून अनेक मोडणारे संसार फुलविले आहेत, तसेच बऱ्याच पोस्को गुन्ह्यांमध्ये त्यांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. यासोबतच जास्तीत जास्त गुन्हे दोषसिद्धी केल्यामुळे प्रवर्ग ३ नुसार त्यांना सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. तसेच ठाणेदार सतीश सिंग रणजितसिंह राजपूत यांनीसुद्धा शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हेगारीवर अंकूश लावण्यात यश मिळविले होते. दोघांनीही केलेली कामगिरी उल्लेखनीय असल्याने त्यांना सन्मानचिह जाहीर झाले आहे.