कागदपत्राअभावी प्रवेशासाठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST2020-08-22T05:00:00+5:302020-08-22T05:00:36+5:30

आज ना उद्या वसतिगृहात पुन्हा परत येणे होईल या आशेवर विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे, तसेच अनेक साहित्य वसतिगृहातच ठेवले होते. मात्र तिन्ही वसतिगृहात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात जाण्यास बंधन आहे. परंतु, अनेक शाखेतील अनेक प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.

Difficulty access due to lack of documentation | कागदपत्राअभावी प्रवेशासाठी अडचण

कागदपत्राअभावी प्रवेशासाठी अडचण

ठळक मुद्देवसतिगृहात अडकले कागदपत्र : ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विलगीकरण कक्षासाठी चंद्रपूर येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह ताब्यात घेवून विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे लगबगीने वसतिगृह सोडावे लागले. मात्र त्याचे मूळ कागदपत्र वसतिगृहातच लटकून आहेत. वसतिगृहात विलगीकरण कक्ष असल्याने वसतिगृहात जाण्यास बंदी आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचण जात आहे.
चंद्रपूर येथे आदिवासी मुलीचे शासकीय वसतिगृह क्रमांक एक व दोन तर मुलांचे वसतिगृह क्रमांक दोन वसतिगृह आहे. या तिन्ही वसतिगृलहात जिल्ह्यातील अकरावी ते पदवीधर शिक्षण घेणारे सुमारे ५०० विद्यार्थी वास्तव्यास आहेत. मार्च महिन्यात कोरोना विषाणूची लागण होताच शाळा-महाविद्यालये बंद झाली. त्यामुळे तिन्ही वसतिगृहातील विद्यार्थी मिळेल त्या साधनाने स्वगृही गेले. मात्र आज ना उद्या वसतिगृहात पुन्हा परत येणे होईल या आशेवर विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे, तसेच अनेक साहित्य वसतिगृहातच ठेवले होते. मात्र तिन्ही वसतिगृहात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात जाण्यास बंधन आहे. परंतु, अनेक शाखेतील अनेक प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. तसेच काही जणांना मुळ कागदपत्रे महाविद्यालयात जमा करावयाचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्राची गरज आहे. परंतु, वसतिगृहात जाण्यास बंदी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचण जात आहे.

वसतिगृह खाली करण्याची मागणी
वसतिगृहात विलगीकरण कक्ष असल्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात जाणे कठीण झाले आहे.त्यांना कागदपत्राची आवश्क्यता असल्याने वसतिगृह खाली करुन निर्जंतुकीकरण करुन द्यावे, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळांनी प्रकल्प अधिकाऱ्याला निवेदनातून केली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष शुभम उईके, जिल्हा सचिव राजू सिडाम, सुरज निमसरकार, जितू पेंदाम, माणिक किन्नाके, मोनाली घरत, आश्विना शेरकुरे, प्रतीक्षा चौधरी, मृणाली चौधरी उपस्थित होते.

Web Title: Difficulty access due to lack of documentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.