सिग्नल सुरु करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST2021-03-17T04:29:27+5:302021-03-17T04:29:27+5:30

प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त चंद्रपूर : जिल्ह्यात औष्णिक वीज प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पातून निघणाऱ्या धुरांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या ...

Demand to start the signal | सिग्नल सुरु करण्याची मागणी

सिग्नल सुरु करण्याची मागणी

प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : जिल्ह्यात औष्णिक वीज प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पातून निघणाऱ्या धुरांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे या प्रदुषणाच्या समस्येवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

एटीएमध्ये सुरक्षा रक्षक नाही

चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी एटीएममशीन बसविण्यात आल्या. मात्र मागील काही दिवसांपासून पैशाचा ठणठणाट आहे. त्यातच सुरक्षा रकक्षही नसल्यामुळे एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वीज खांबामुळे अपघाताचा धोका

चंद्रपूर : शहरातील काही चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध वीज खांब आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे खांब काढून दिलासा द्यावा,अशी मागणी केली जात आहे.

गर्दीवर नियंत्रण नाही

चंद्रपूर : ग्रामीण भागातील काही गावांतील नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने नागरिक आधार कार्ड काढण्यासाठी शहरात येत आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्डची गरज असते. त्यामुळे आधार कार्ड नोंदणी केंद्र शोधताना सध्या नागरिक दिसत आहे. त्यामुळे गावागावात आधार कॉर्ड केंद्र सुरु करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी

चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. यामुळे अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नेटवर्कअभावी ग्राहक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील काही वार्डामध्ये विविध कंपन्यांसह बीएसएनएलचेसुद्धा नेटवर्क नाही. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. त्यातच ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेटवर्क समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.

बेरोजगारांमध्ये नैराश्य वाढले

चंद्रपूर: जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुशिक्षीत बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहे.त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी तसेच जिल्ह्यात अधिकधिक उद्योगाची निर्मिती करावी, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.

फळांची मागणी वाढली

चंद्रपूर : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विटामिन सीयुक्त फळे खायला नागरिक पसंती देत आहेत. त्यातच आता ‌उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यामुळे सध्या बाजारपेठेत फळे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे.

मनपाच्या दुर्लक्षाने अतिक्रमण वाढले

चंद्रपूर : शहरातील गांधी मार्ग तसेच कस्तुरबा मार्गावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Demand to start the signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.