शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

चंदनखेड्यातील नेहरू विद्यालयाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:30 IST

सन १६७० ला चंदनखेडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नेहरु विद्यालयाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. या शाळेने पंचक्रोशित नाव कमाविले असले तरी संस्था संचालक व मंडळात नेहमीच अंतर्गत वाद उद्भवत असते.

ठळक मुद्देमुलभूत सुविधांचा अभाव : संस्थाचालक व मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनखेडा : सन १६७० ला चंदनखेडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नेहरु विद्यालयाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. या शाळेने पंचक्रोशित नाव कमाविले असले तरी संस्था संचालक व मंडळात नेहमीच अंतर्गत वाद उद्भवत असते. तसेच कार्यरत मुख्याध्यापकाच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे या शाळेत अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या नावलौकीक शाळेला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे.चिमूर एज्युकेशन सोसायटी, चिमूर अंंतर्गत ही शाळा चालविली जाते. या संस्थेच्या चंदनखेडा सोबतच चिमूर, शंकरपूर, चारगाव, शेगाव बुज. येथेही शाळा आहेत. सुरुवातीचा काही वर्षांचा कालावधी सोडला तर संचालक मंडळात नेहमीच वाद झाला आहे. त्याचे पर्यवसान शाळेकडे संस्थेचे दुर्लक्ष होत गेले व दिवसेंदिवस समस्या वाढत गेल्या. परंतु, येथील समस्यांबाबत संचालक मंडळाला एकदाही लेखी पत्राद्वारे शाळेच्या समस्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न कार्यरत मुख्याध्यापकाने केला नाही. आजघडीला या शाळेची इमारत मोडकळीस व धोकादायक स्थितीत असतानाही तेथे वर्ग भरविण्यात येत आहे.छताचे कवेलू फूटल्याने पावसात छत गळत असते. खोलीत पंखे नाही, भिंतींना रंगरंगोटी नाही, मुलांकरिता संगणक संच नाही. तसेच मुला-मुलींकरिता स्वतंत्र शौचालय, मुत्रीघर नाही. खिडक्यांना तावदान नाही. चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकच असल्याने मुलांनाच शाळेची खोली व परिसर स्वच्छता करावी लागत आहे. काही वर्षांपूर्वी इमारतीची निकड लक्षात घेवून काही उत्साही शिक्षकानी पुढाकार घेतला. गावकरी व संस्थेच्या मदतीतून व्यवसायिक नाटकाचे आयोजन करुन त्यातून मिळालेल्या रक्कमेतून तथा इतर रक्मकेची जुळवाजुळव करुन एक मजली इमारत बांधण्यात आली होती. मात्र आता अनेक वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे.सुरुवातीच्या काळात शाळेतील शिक्षणाचा दर्जा होता. परंतु आजघडीला शाळेला कोणी वाली नसल्याने शाळेचा शैक्षणिक दर्जा खूप घसरला आहे. शंभर टक्के अनुदान मिळाणाऱ्या या शाळेत एकेकाळी विद्यार्थ्यांची दाटी होत होती. मात्र आता या शाळेत विद्यार्थी, पटसंख्या टिकवून ठेवण्याकरिता गावोगावी भटकंती करून तथा मुलांना खाजगी वाहन किरायाने करुन नेण्याची व्यवस्था स्वत: शिक्षकांना करावी लागत आहे.शाळेच्या हितासाठी जेवढे प्रयत्न करता आले तेवढे केले. मात्र संस्थेच्या वादात शाळेचा विकास झाला नाही. उलट मला निवृत्तीची केस सादर करावी लागली.- नंदा सोनकुसरे,मुख्याध्यापिका, चंदनखेडा.

टॅग्स :Schoolशाळा