शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

चंदनखेड्यातील नेहरू विद्यालयाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:30 IST

सन १६७० ला चंदनखेडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नेहरु विद्यालयाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. या शाळेने पंचक्रोशित नाव कमाविले असले तरी संस्था संचालक व मंडळात नेहमीच अंतर्गत वाद उद्भवत असते.

ठळक मुद्देमुलभूत सुविधांचा अभाव : संस्थाचालक व मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनखेडा : सन १६७० ला चंदनखेडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नेहरु विद्यालयाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. या शाळेने पंचक्रोशित नाव कमाविले असले तरी संस्था संचालक व मंडळात नेहमीच अंतर्गत वाद उद्भवत असते. तसेच कार्यरत मुख्याध्यापकाच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे या शाळेत अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या नावलौकीक शाळेला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे.चिमूर एज्युकेशन सोसायटी, चिमूर अंंतर्गत ही शाळा चालविली जाते. या संस्थेच्या चंदनखेडा सोबतच चिमूर, शंकरपूर, चारगाव, शेगाव बुज. येथेही शाळा आहेत. सुरुवातीचा काही वर्षांचा कालावधी सोडला तर संचालक मंडळात नेहमीच वाद झाला आहे. त्याचे पर्यवसान शाळेकडे संस्थेचे दुर्लक्ष होत गेले व दिवसेंदिवस समस्या वाढत गेल्या. परंतु, येथील समस्यांबाबत संचालक मंडळाला एकदाही लेखी पत्राद्वारे शाळेच्या समस्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न कार्यरत मुख्याध्यापकाने केला नाही. आजघडीला या शाळेची इमारत मोडकळीस व धोकादायक स्थितीत असतानाही तेथे वर्ग भरविण्यात येत आहे.छताचे कवेलू फूटल्याने पावसात छत गळत असते. खोलीत पंखे नाही, भिंतींना रंगरंगोटी नाही, मुलांकरिता संगणक संच नाही. तसेच मुला-मुलींकरिता स्वतंत्र शौचालय, मुत्रीघर नाही. खिडक्यांना तावदान नाही. चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकच असल्याने मुलांनाच शाळेची खोली व परिसर स्वच्छता करावी लागत आहे. काही वर्षांपूर्वी इमारतीची निकड लक्षात घेवून काही उत्साही शिक्षकानी पुढाकार घेतला. गावकरी व संस्थेच्या मदतीतून व्यवसायिक नाटकाचे आयोजन करुन त्यातून मिळालेल्या रक्कमेतून तथा इतर रक्मकेची जुळवाजुळव करुन एक मजली इमारत बांधण्यात आली होती. मात्र आता अनेक वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे.सुरुवातीच्या काळात शाळेतील शिक्षणाचा दर्जा होता. परंतु आजघडीला शाळेला कोणी वाली नसल्याने शाळेचा शैक्षणिक दर्जा खूप घसरला आहे. शंभर टक्के अनुदान मिळाणाऱ्या या शाळेत एकेकाळी विद्यार्थ्यांची दाटी होत होती. मात्र आता या शाळेत विद्यार्थी, पटसंख्या टिकवून ठेवण्याकरिता गावोगावी भटकंती करून तथा मुलांना खाजगी वाहन किरायाने करुन नेण्याची व्यवस्था स्वत: शिक्षकांना करावी लागत आहे.शाळेच्या हितासाठी जेवढे प्रयत्न करता आले तेवढे केले. मात्र संस्थेच्या वादात शाळेचा विकास झाला नाही. उलट मला निवृत्तीची केस सादर करावी लागली.- नंदा सोनकुसरे,मुख्याध्यापिका, चंदनखेडा.

टॅग्स :Schoolशाळा