शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चंदनखेड्यातील नेहरू विद्यालयाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:30 IST

सन १६७० ला चंदनखेडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नेहरु विद्यालयाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. या शाळेने पंचक्रोशित नाव कमाविले असले तरी संस्था संचालक व मंडळात नेहमीच अंतर्गत वाद उद्भवत असते.

ठळक मुद्देमुलभूत सुविधांचा अभाव : संस्थाचालक व मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनखेडा : सन १६७० ला चंदनखेडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नेहरु विद्यालयाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. या शाळेने पंचक्रोशित नाव कमाविले असले तरी संस्था संचालक व मंडळात नेहमीच अंतर्गत वाद उद्भवत असते. तसेच कार्यरत मुख्याध्यापकाच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे या शाळेत अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या नावलौकीक शाळेला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे.चिमूर एज्युकेशन सोसायटी, चिमूर अंंतर्गत ही शाळा चालविली जाते. या संस्थेच्या चंदनखेडा सोबतच चिमूर, शंकरपूर, चारगाव, शेगाव बुज. येथेही शाळा आहेत. सुरुवातीचा काही वर्षांचा कालावधी सोडला तर संचालक मंडळात नेहमीच वाद झाला आहे. त्याचे पर्यवसान शाळेकडे संस्थेचे दुर्लक्ष होत गेले व दिवसेंदिवस समस्या वाढत गेल्या. परंतु, येथील समस्यांबाबत संचालक मंडळाला एकदाही लेखी पत्राद्वारे शाळेच्या समस्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न कार्यरत मुख्याध्यापकाने केला नाही. आजघडीला या शाळेची इमारत मोडकळीस व धोकादायक स्थितीत असतानाही तेथे वर्ग भरविण्यात येत आहे.छताचे कवेलू फूटल्याने पावसात छत गळत असते. खोलीत पंखे नाही, भिंतींना रंगरंगोटी नाही, मुलांकरिता संगणक संच नाही. तसेच मुला-मुलींकरिता स्वतंत्र शौचालय, मुत्रीघर नाही. खिडक्यांना तावदान नाही. चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकच असल्याने मुलांनाच शाळेची खोली व परिसर स्वच्छता करावी लागत आहे. काही वर्षांपूर्वी इमारतीची निकड लक्षात घेवून काही उत्साही शिक्षकानी पुढाकार घेतला. गावकरी व संस्थेच्या मदतीतून व्यवसायिक नाटकाचे आयोजन करुन त्यातून मिळालेल्या रक्कमेतून तथा इतर रक्मकेची जुळवाजुळव करुन एक मजली इमारत बांधण्यात आली होती. मात्र आता अनेक वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे.सुरुवातीच्या काळात शाळेतील शिक्षणाचा दर्जा होता. परंतु आजघडीला शाळेला कोणी वाली नसल्याने शाळेचा शैक्षणिक दर्जा खूप घसरला आहे. शंभर टक्के अनुदान मिळाणाऱ्या या शाळेत एकेकाळी विद्यार्थ्यांची दाटी होत होती. मात्र आता या शाळेत विद्यार्थी, पटसंख्या टिकवून ठेवण्याकरिता गावोगावी भटकंती करून तथा मुलांना खाजगी वाहन किरायाने करुन नेण्याची व्यवस्था स्वत: शिक्षकांना करावी लागत आहे.शाळेच्या हितासाठी जेवढे प्रयत्न करता आले तेवढे केले. मात्र संस्थेच्या वादात शाळेचा विकास झाला नाही. उलट मला निवृत्तीची केस सादर करावी लागली.- नंदा सोनकुसरे,मुख्याध्यापिका, चंदनखेडा.

टॅग्स :Schoolशाळा