मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:01 IST2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:01:09+5:30

सत्यवान सरवरे हे येथील वार्ड एकमध्ये कुडाच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक स्थिती यथातथाच आहे. सावरगाव परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस पडल्याने यांच्या कुडाचे घर कोसळले. सावरगाव व परिसरातील काही घरांचे नुकसान झाले. घर कोसळल्याने सरवरे यांच्या कुटुंबाने सध्या दुसरीकडे आश्रय घेतला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी गणपत वऱ्हाडपांडे घराचा पंचनामा केला.

Damage to houses due to torrential rains | मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान

ठळक मुद्देसावरगावात घर कोसळले : सर्र्वेक्षण करून भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. सत्यवान सरवरे यांचे घर कोसळल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुटुंबातील कुणालाही इजा झाली नाही.
सत्यवान सरवरे हे येथील वार्ड एकमध्ये कुडाच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक स्थिती यथातथाच आहे. सावरगाव परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस पडल्याने यांच्या कुडाचे घर कोसळले. सावरगाव व परिसरातील काही घरांचे नुकसान झाले. घर कोसळल्याने सरवरे यांच्या कुटुंबाने सध्या दुसरीकडे आश्रय घेतला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी गणपत वऱ्हाडपांडे घराचा पंचनामा केला.
सत्यवान सरवरे कुटुंबाला घरकुल उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य नयना गेडाम यांच्याकडे केली आहे. या परिसरातील नागरिक शेतीवरच अवलंबून आहेत. मागील वर्षी शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती अद्याप रूळावर आली नाही. ९५ टक्के शेतकऱ्यांच्या रोवण्या आटोपल्या आहेत.
शेतीसाठी जमा करून ठेवलेली पुंजी संपली. अशा परिस्थिती शेतकऱ्यांच्या समस्येत पुन्हा भर पडली आहे.

बीपीएल यादीत असूनही घरकुलासाठी अन्याय
दहा वर्षांपासून सत्यवान सरवरे घरकुलासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज करीत आहेत. त्यांचे नाव बीपीएल यादीत आहे. मात्र त्यांना घरकुल मिळाले नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या घरकुलच्या ड यादीतही त्यांचे नाव नाही. घरकुल प्राप्त झाले नाही. पतंप्रधान आवास योजनेतील ड यादीतही गरजवंतांची नावे आली नाही.
कोरोनामुळे आर्थिक संकट
लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली. ऐन शेतीच्या हंगामात प्रशासनाने लॉकडाऊन केले होते. त्यामुळे शेतकºयांना पैशाची जुळवाजुळवा करता आली नाही. खरीप हंगामासाठी अनेकांनी कर्ज काढले. पीक कर्जासाठी चकरा मारूनही परिसरातील बºयाच शेतकºयांचा हिरमोड झाला आहे.

Web Title: Damage to houses due to torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस