शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिज्ञासेतून घडताहेत बालवैज्ञानिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 22:29 IST

‘बाळा तु लहान आहेस तुला हे कळणार नाही’ असे सहजपणे बोलणारे अनेक पालक आपल्या अवतीभोवती दिसतात.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन : विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतीतून उलगडले वैश्विक सत्य

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ‘बाळा तु लहान आहेस तुला हे कळणार नाही’ असे सहजपणे बोलणारे अनेक पालक आपल्या अवतीभोवती दिसतात. विज्ञान व तंत्रज्ञानाने दिलेल्या शोध-संशोधनातून निर्माण झालेल्या वस्तुंचा दैनंदिन वापर सुरू असतानाही त्यातील वैज्ञानिक दृष्टी समजून घेण्याची कुणी तसदी घेत नाहीत. परिणामी, सहजसाध्या शब्दांतून बालकांची वैज्ञानिकता संपवून टाकण्याची मानसिकता प्रबळ होताना दिसते. या चुकीच्या मनोवृत्तीने बालकांची वैज्ञानिक जिज्ञासा संपुष्ठात येते. खरे तर निसर्ग आणि समाजातील विविध घटनांच्या सहवासातून असंख्य प्रश्न विचारणाऱ्या बालकांना ‘गप्प बस ’ही धमकावणी थेट धोकादायक वळणावर घेऊन जाते. मात्र, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला पाठिंबा देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र आल्यास वैज्ञानिक होण्याची धडपड सुरू होते, हे भवानजीभाई चव्हाण हायस्कूलमधील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदशर्नातून दिसून आले.विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि स्वत:चे ज्ञान व निरीक्षणातून विविध प्रयोग सादर करता यावे, यासाठी जि. प. शिक्षण विभागाने स्थानिक भवानजीभाई विद्यालयात जिल्हा परिषद व खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरविले. या प्रदर्शनात ग्रामीण व शहरी भागातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विज्ञानिक प्रयोग सादर केले.बाल मानसशास्त्रानुसार प्रत्येक विद्यार्थी म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व. कुटुंब, शाळा आणि सामाजिक पर्यावरणातून बालकांची मनोभूमिका तयार होते. विद्यार्थ्यांच्या रोजच्या जगण्यात विज्ञानाचे अनेक संदर्भ येतात. लहान-लहान घटनांमध्ये विज्ञान दडले असून त्याचा कार्यकारणभाव समजावून सांगणाऱ्या पालक व शिक्षकांची आज खरी गरज आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे संपूर्ण जीवन शेतीवरच आधारीत आहेत. त्यामुळे शिक्षणासोबतच शेती व मातीचा संबंध येणाऱ्या बालकांना विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितल्यास दृष्टिकोन बदलेल. विविध प्रश्न विचारून स्वत:च उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतील. यंदाच्या ४३ व्या विज्ञान प्रदर्शनात बहुतेक विद्यार्थ्यांनी शेती व पर्यावरणाशी निगडीत प्रयोग सादर केले. बदलेली शेती, पर्यावरणातील हानिकारक बदल, सेंद्रीय शेती, पाण्याची बचत, सूर्य आणि चंद्राचे महत्त्व, पाऊस कसा पडतो, यासाठी कारणीभूत घटक याची शास्त्रीय माहिती घेऊन प्रयोगांची मांडणी केली. शिक्षक व पालकांच्या बदलेल्या मानसिकतेचा हा परिणाम आहे.सहज, साध्या वस्तुंचा वापरराज्याच्या प्राथमिक व माध्यमिक शैक्षणिक धोरणांमध्ये वैज्ञानिक जाणिवेला अग्रस्थान दिले आहे. भारतीय संविधानानेही वैज्ञानिक मूल्यांचा पुरस्कार केला. मात्र, विद्यार्थ्यांच्या जाणिवा समृद्ध व्हावे, यासाठी शासनाकडून आर्थिक निधी आणि पायाभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांना वैज्ञानिक मूल्यांचे बिजारोपण करीत आहेत. विज्ञानातून माणूस घडतो. संकटांवर मात करण्याचे धैर्य विज्ञान देते. त्यामुळे परिसरात उपलब्ध वस्तुंचा वापर यंदाच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनात केल्याचे दिसून आले.वैज्ञानिकांचे स्मरण...विज्ञानाचे विविध प्रयोग प्रयोगशाळेत होतात. मात्र, या प्रयोगांचे प्रेरणास्त्रोत मानवी जीवनात असते, अशी भूमिका डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांनी मांडली होती. विज्ञान विषयाचे सुलभीकरण करून क्लिष्ट संकल्पना अतिशय सोप्या समजावून सांगणाºया डॉ. होमीभाभा यांच्यापासून तर जगभरातील प्रसिद्ध वैज्ञानिकांच्या कार्याची माहितीही गावखेड्यातील विद्यार्थी सहजपणे देताना दिसले. महाराष्ट्रातील शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. विजय भटकर यांच्या योगदानाची सविस्तर माहिती देऊन वैज्ञानिक होण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.’लोकमत’ वर कौतुकाचा वर्षावब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद कनिष्ठ महाविद्यालयातील विक्रांत कुथे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या ‘सोल्जरलेस गन’ या प्रतिकृतीवर ‘लोकमत’ ने बुधवारी शोधकथा प्रकाशित केली होती. विज्ञाननिष्ठेला चालना दिल्याने समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ‘लोकमत’ वर कौतुकाचा वर्षाव केला. विशेष म्हणजे या प्रतिकृतीला परीक्षकांनी प्रथम पुरस्कार जाहीर करून राज्यस्तरीय निवड केली आहे.बदलती शेतीकृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहे. या बदलानुसार शेतकºयांनी आधुनिक शेती करावी, यासाठी सिंदेवाही तालुक्यातील सीताबाई माध्यमिक विद्यालयाच्या प्राची विठ्ठ गभणे या विद्यार्थिनीने प्रतिकृती सादर केली.काष्ठ शिल्पातील विज्ञानशेती अथवा वन परिसरात उपलब्ध असलेल्या विविध वृक्षाचा बुंधा आणि लाकडापासून जीवनोपयोगी वस्तु तयार करता येतात. पशुपक्षी आणि वन्यजीवसृष्टीच्या सहचरातून निसर्गाचे रक्षण करा, असा संदेश देणाºया काष्ठशिल्पाने उपस्थितांची मने आकर्षित केली होती.