शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

वन्यप्राण्यांमुळे पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:32 PM

पर्यावरण संवर्धनासाठी वन्यजीवाच्या संरक्षणात बफर झोन क्षेत्र तयार करण्यात आले. या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झालेली आहे. शेतकऱ्यांचे अपार कष्ट मातीमोल होत असून पिकांच्या नुकसानीमुळे पुन्हा शेतकरी वर्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे.

ठळक मुद्देशेतकरी पुन्हा समस्यांच्या विळख्यात : शेतकऱ्यांची झोपच उडाली

लोकमत न्यूज नेटवर्कमारोडा : पर्यावरण संवर्धनासाठी वन्यजीवाच्या संरक्षणात बफर झोन क्षेत्र तयार करण्यात आले. या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झालेली आहे. शेतकऱ्यांचे अपार कष्ट मातीमोल होत असून पिकांच्या नुकसानीमुळे पुन्हा शेतकरी वर्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे.केवळ आणि केवळ पावसाच्या भरवशावर उभा राहण्याचा प्रयत्न शेतकरी वर्ग करतो. मागील वर्षी धान पिकांचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले. कर्ज काढले, तेही पुरते फेडले गेले नाही. यावर्षी पुन्हा कर्ज काढून पीक जोमाने उभे केले. मात्र वन्यप्राण्यांनी उभे पीक उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे.मागील दोन महिन्यांपासून शेतकरी सुखाने झोपलेला नाही. अगदी मावळतीच्या पूर्वी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास २० ते २५ च्या समुहाने येणाऱ्या रानडुकरांनी उभ्या लोंबाच्या धानपिकांत प्रचंड हैदोस घालणे सुरू केले आहे. साधरणत: सायं ४ वाजताच्या सुमारास उब्बा घेऊन शेतकरी घराबाहेर पडतो. आणि रानडुकरांना हाकलून लावण्यासाठी वारंवार ओरड करीत असतो. रात्रभर डोळ्यांना झोप नाही, अशा स्थितीतही त्यांनी पिकांना सरंरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी अनेक शेतकऱ्यांचे नुकसानच झाले. यापूर्वीचा नुकसान भरपाईचा प्रस्ताव वनविभागाकडे पडून आहे. त्याची चौकशी होईल. त्या चौकशीत वेगवेगळे सदस्य एकत्रित जमा होतील. त्यानंतर नुकसान भरपाई किती द्यायची ते ठरवतील. ही दरवर्षीची समस्या आहे. स्थानिक रोजगार नाही. दुधाळू जनावरांना ही वन्यप्राण्यांच्या भीतीपोटी चारा नाही. नेमके शेतकºयांनी काय करायचे, हा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर सध्या उभा ठाकला आहे.