शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

पालिकेने घेतला स्वच्छ व सुंदरतेचा ध्यास

By admin | Updated: February 26, 2016 01:09 IST

भद्रावती शहर हे पर्यटननगरी घोषित झाली. त्यामुळे शहरात देश-विदेशातून लाखो नागरिक तथा भाविक येत असतात.

भद्रावतीकरांकडून सहकार्याची अपेक्षा : स्मार्ट सिटी करण्यासाठी धडपडआयुधनिर्माणी : भद्रावती शहर हे पर्यटननगरी घोषित झाली. त्यामुळे शहरात देश-विदेशातून लाखो नागरिक तथा भाविक येत असतात. आपले शहर या पाहुण्यांनी स्वच्छ व सुंदर शहर म्हणून अनुभवावे. एक स्मार्ट सिटी म्हणून भद्रावतीची ओळख जगाच्या नकाशावर निर्माण व्हावी, यासाठी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना स्वच्छ व सुंदर भद्रावतीचा ध्यास लागलेला आहे. त्यासाठी शहरवासीयांनी सहकार्य करुन सुंदर भद्रावतीच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.शहरातील नागरिकांना वीज, पाणी व रस्ते तथा भौगोलिक सुविधा पुरविणे हे नगरपालिकेचे काम आहे. पालिकेत राजकारणी मंडळी सत्ताधारी झाली की, आपली रुटीन कामे करीत असतात. भद्रावती पालिकाही याकामात कार्यरत आहे. परंतु या व्यतिरिक्त शहराच्या सुंदरतेचा ध्यास मनात बाळगून त्या दिशेने सक्रीय पाडले टाकणारे पालिका प्रशासन आपल्या आगळ्या-वेगळ्या कामाने शहरात कौतुकाचा विषय झालेले आहे.स्वच्छ भद्रावती ठेवण्यासाठी पालिकेने स्वत: पुढाकार घेऊन प्रत्येक कुटुंबाला दोन कचराकुंड्या विनामूल्य पुरविण्याचा संकल्प केलेला आहे. या कचराकुंड्या प्रत्येकी दहा लिटर क्षमतेच्या असून दोन रंगांच्या आहेत. हिरव्या रंगाच्या कचरा कुंडीत ओला कचरा व लाल रंगाच्या कचरा कुंडीत सुका म्हणजे वाळलेला कचरा जमा करावयाचा आहे. सदर कचराकुंडीचे वाटप पालिकेतर्फे सुरू होणार असून मालमत्ताधारकांनी चालू वर्षाचा कर भरल्याची पावती दाखवून या कचराकुंडीला नि:शुल्क घरी नेता येणार आहे. आता पालिका प्रशासनानेच कचराकुंड्या वितरित केल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार असल्याने रस्त्यावर पडणारा कचरा कुंडीतच पडल्याने शहरातील सार्वत्रिक घाण कमी होण्यास मदत होणार आहे.१ फेब्रुवारीपासून भद्रावती शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. अशा प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वा कागदी पिशव्यांचा पर्याय पालिकेने पुढे आणला आहे. या उपरांत कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा विक्रीसाठी वापर होत असल्याचे लक्षात येताच, १५ दुकानदारांवर कारवाई करुन ५० किलो पिशव्या पालिकेने जप्त केल्या आहे. पालिका शहराच्या सुंदरतेकरिता प्लास्टिक निर्मूलनावर विशेष भर देणार आहे. तसा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावही मंजूर करुन घेतला आहे. प्लास्टिक पिशव्या वापर करणाऱ्यांवर पालिकेची वक्रदृष्टी असल्याचे शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापर कमी होईल. परिणामत: इकडेतिकडे फेकल्यानंतर दिसणारे ओंगळवाणे प्लास्टिक दर्शन कमी होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असा नागरिकांना विश्वास आहे. नगराध्यक्ष अनिल धानोरकर स्वत: शहराची सुंदरता गांभीर्याने घेऊन विविध सामाजिक संथा व कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून असल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यास भद्रावती शहर स्वच्छ व सुंदर शहर म्हणून नावारुपास येईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.(वार्ताहर)