शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

कोरपना नगरी शैक्षणिक क्षेत्रात मागासलेलीच

By admin | Updated: October 27, 2014 22:34 IST

तेलंगणाच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय म्हणून कोरपना शहराची ओळख आहे. तालुका निर्मिती होऊन २४ वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला आहे. मात्र, तालुक्याचे गाव असलेला कोरपना शहर

वनसडी : तेलंगणाच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय म्हणून कोरपना शहराची ओळख आहे. तालुका निर्मिती होऊन २४ वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला आहे. मात्र, तालुक्याचे गाव असलेला कोरपना शहर आजही शैक्षणिकदृष्ट्या अविकसितच आहे.या परिसरातील हजारो विद्यार्थी दररोज चंद्रपूर, गडचांदूर, शिंदोला, राजुरा, बल्लारपूर, उपरवाही, नांदा, जिवती आदी ठिकाणी असलेल्या शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेवून ‘अपडाऊन’ करतात. आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नसले तरी या खेरीज विद्यार्थी व पालकांपुढे पर्याय नाही. त्यामुळे कोरपन्यातील विद्यार्थी मुंबई, पुणे, हैद्राबाद सारख्या महानगरांपासून ते वणी, वरोरा, आदिलाबाद सारख्या जवळच्या शहरात शिक्षणासाठी प्रवेश घेताना दिसत आहेत. कोरपना शहरात अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालये आहे. परंतु पाल्याच्या शैक्षणिक बाबीचा विचार करता तेही ‘अपडाऊन’च करणे पसंद करतात. शैक्षणिकदृष्ट्या अविकासामुळे कोरपन्यात बाहेरून आलेले नागरिक सहसा स्थिरावत नाही. केवळ शिक्षणामुळे येथे नागरिक स्थायी होत नाही, हे दुदैव आहे. या ठिकाणी ५ कॉन्व्हेंट, १ प्राथमिक शाळा, २ माध्यमिक शाळा, २ कनिष्ठ महाविद्यालय, १ वरिष्ठ महाविद्यालय, १ पॉलीटेक्नीक महाविद्यालय, १ आश्रमशाळा, आय.टी.आय., १ मॅनेजमेंट कॉलेज आहे. परंतु विज्ञान, वाणिज्य, एम.सी.व्ही.सी., पदव्युत्तर शिक्षणातील अनेक विद्या शाखेचे अभ्यासक्रम येथे नसल्यामुळे येथील विद्यार्थी इतर ठिकाणी शिक्षणासाठी जातात. आज विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल विज्ञान, व्यावसायिक तंत्र शाखेकडे आहे. मात्र तालुक्याच्याच ठिकाणी अभ्यासक्रम नाही म्हटल्यावर आजुबाजुच्या गावातील शैक्षणिक विकास कसा होईल? हे या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त व मागासलेल्या तालुक्याबाबत कल्पना न केलेलीच बरी. येथील प्राथमिक शाळा सध्या आॅक्सिजनवर असल्याचे दिसते. शाळेचा शैक्षणिक दर्जा ‘क’ आहे. दिवसेंदिवस हा दर्जा घटतच चालला. त्यामुळे पटसंख्याही कमी होत आहे. भविष्यात येथील शाळा दर्जात्मक शिक्षण व पायाभूत सुविधा अभावी बंद पडते की काय? अशी भिती व्यक्त होत आहे. संगणक असले तरी संगणकीय शिक्षणापासून तालुकास्तरावरचेच विद्यार्थी वंचित आहे. येथील पंचायत समितीने शाळेतील दोन संगणक आपल्या कार्यालयीन उपयोगासाठी नेले असल्याने येथील प्राथमिक शिक्षणाचा पाया केवळ आनास्थेमुळे अधूर होत चालला आहे. भविष्यात शिक्षणात आपल्या पाल्याची राखरांगोळीच होईल, या भितीने पालकांनी विद्यार्थ्यांना इतरत्र ठिकाणी प्रवेश घ्यायला लावले आहे. शैक्षणिकदृष्ट्या वातावरण पोषक नसल्याने अनेक विद्यार्थी बालमजुरीकडे वळताना दिसतात. तालुका औद्योगिकदृष्ट्या प्रगत असला तरी कोरपना परिसरात उद्योगांचा पत्ता नाही. त्यामुळे येथून शिकलेले सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी येथे राहत नाही. विद्यार्थ्यात शिक्षणांविषयी गोळी निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्मितीची गरज आहे. काही शाळांचा शैक्षणीक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्या शाळांना विविध अभ्यासक्रम व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन कोरपन्याचा शैक्षणिक दृष्ट्या खुंटलेला विकास करणे गरजेचे आहे. गोंडवाना विद्यापीठ व शिक्षण विभाग विविध शैक्षणिक उपक्रम राबवून या तालुकास्तरावरची शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)