शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना नगरी शैक्षणिक क्षेत्रात मागासलेलीच

By admin | Updated: October 27, 2014 22:34 IST

तेलंगणाच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय म्हणून कोरपना शहराची ओळख आहे. तालुका निर्मिती होऊन २४ वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला आहे. मात्र, तालुक्याचे गाव असलेला कोरपना शहर

वनसडी : तेलंगणाच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय म्हणून कोरपना शहराची ओळख आहे. तालुका निर्मिती होऊन २४ वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला आहे. मात्र, तालुक्याचे गाव असलेला कोरपना शहर आजही शैक्षणिकदृष्ट्या अविकसितच आहे.या परिसरातील हजारो विद्यार्थी दररोज चंद्रपूर, गडचांदूर, शिंदोला, राजुरा, बल्लारपूर, उपरवाही, नांदा, जिवती आदी ठिकाणी असलेल्या शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेवून ‘अपडाऊन’ करतात. आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नसले तरी या खेरीज विद्यार्थी व पालकांपुढे पर्याय नाही. त्यामुळे कोरपन्यातील विद्यार्थी मुंबई, पुणे, हैद्राबाद सारख्या महानगरांपासून ते वणी, वरोरा, आदिलाबाद सारख्या जवळच्या शहरात शिक्षणासाठी प्रवेश घेताना दिसत आहेत. कोरपना शहरात अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालये आहे. परंतु पाल्याच्या शैक्षणिक बाबीचा विचार करता तेही ‘अपडाऊन’च करणे पसंद करतात. शैक्षणिकदृष्ट्या अविकासामुळे कोरपन्यात बाहेरून आलेले नागरिक सहसा स्थिरावत नाही. केवळ शिक्षणामुळे येथे नागरिक स्थायी होत नाही, हे दुदैव आहे. या ठिकाणी ५ कॉन्व्हेंट, १ प्राथमिक शाळा, २ माध्यमिक शाळा, २ कनिष्ठ महाविद्यालय, १ वरिष्ठ महाविद्यालय, १ पॉलीटेक्नीक महाविद्यालय, १ आश्रमशाळा, आय.टी.आय., १ मॅनेजमेंट कॉलेज आहे. परंतु विज्ञान, वाणिज्य, एम.सी.व्ही.सी., पदव्युत्तर शिक्षणातील अनेक विद्या शाखेचे अभ्यासक्रम येथे नसल्यामुळे येथील विद्यार्थी इतर ठिकाणी शिक्षणासाठी जातात. आज विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल विज्ञान, व्यावसायिक तंत्र शाखेकडे आहे. मात्र तालुक्याच्याच ठिकाणी अभ्यासक्रम नाही म्हटल्यावर आजुबाजुच्या गावातील शैक्षणिक विकास कसा होईल? हे या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त व मागासलेल्या तालुक्याबाबत कल्पना न केलेलीच बरी. येथील प्राथमिक शाळा सध्या आॅक्सिजनवर असल्याचे दिसते. शाळेचा शैक्षणिक दर्जा ‘क’ आहे. दिवसेंदिवस हा दर्जा घटतच चालला. त्यामुळे पटसंख्याही कमी होत आहे. भविष्यात येथील शाळा दर्जात्मक शिक्षण व पायाभूत सुविधा अभावी बंद पडते की काय? अशी भिती व्यक्त होत आहे. संगणक असले तरी संगणकीय शिक्षणापासून तालुकास्तरावरचेच विद्यार्थी वंचित आहे. येथील पंचायत समितीने शाळेतील दोन संगणक आपल्या कार्यालयीन उपयोगासाठी नेले असल्याने येथील प्राथमिक शिक्षणाचा पाया केवळ आनास्थेमुळे अधूर होत चालला आहे. भविष्यात शिक्षणात आपल्या पाल्याची राखरांगोळीच होईल, या भितीने पालकांनी विद्यार्थ्यांना इतरत्र ठिकाणी प्रवेश घ्यायला लावले आहे. शैक्षणिकदृष्ट्या वातावरण पोषक नसल्याने अनेक विद्यार्थी बालमजुरीकडे वळताना दिसतात. तालुका औद्योगिकदृष्ट्या प्रगत असला तरी कोरपना परिसरात उद्योगांचा पत्ता नाही. त्यामुळे येथून शिकलेले सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी येथे राहत नाही. विद्यार्थ्यात शिक्षणांविषयी गोळी निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्मितीची गरज आहे. काही शाळांचा शैक्षणीक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्या शाळांना विविध अभ्यासक्रम व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन कोरपन्याचा शैक्षणिक दृष्ट्या खुंटलेला विकास करणे गरजेचे आहे. गोंडवाना विद्यापीठ व शिक्षण विभाग विविध शैक्षणिक उपक्रम राबवून या तालुकास्तरावरची शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)