शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र कोरोना अद्याप पूर्णत: गेला नाही. त्यामुळे या कालावधीत रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी ...

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र कोरोना अद्याप पूर्णत: गेला नाही. त्यामुळे या कालावधीत रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी सहजपणे उपलब्ध होणारा ताजा आणि सकस आहार कोरोनाच नव्हे तर कोणत्याही आजारांवर मात करण्यास उपयुक्त ठरू शकतो. उत्तम आहाराच्या जोरावरच प्रतिकारकशक्ती सुदृढ राहू शकते, ही जाणीव खऱ्या अर्थाने गृहिणींमध्येच रुजली आहे. कोरोनानंतर त्या अधिक सजग झाल्या एवढाच काय तो फरक. गृहिणी आता बाहेरचे अन्न (विशेषत: कच्चे अन्न, रस्त्याच्या कडेला असलेले खाद्य) आणि थंड पदार्थ टाळत आहेत. त्याऐवजी भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, गरम पेये (सूप, गरम पाणी, वरण, काढा घेण्यास कुटुंबाला प्रोत्साहन देत आहेत. तुळस, हळद, पुदीना, लवंगा यासारख्या घशाला आराम देणाऱ्या पदार्थांचा काढा पिण्याचे प्रमाणही आत घरोघरी वाढत असल्याची माहिती चंद्रपुरातील बालाजी वॉर्डातील सुगरण गृहिणी स्मिता चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.

फास्ट फूडवर अघोषित बंदी

हजारो कुटुंंबांच्या घरातील व्यक्तींना कोरोना होऊन गेला. त्यामुळे यापुढचा आहार कसा असावा, याबाबत जागरूकता वाढली.

साखर, मीठ व मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांबाबत गृहिणी आता विचार करू लागल्या. फास्ट फूडऐवजी सकाळी च्यवनप्राश, आवळा शरबत, आवळा कँडी, किवी व अन्य एखादे फळ खाण्याला पसंती दिली जात आहे. कोरोना प्रतिबंधासाठी गृहिणींचे व्हिटॅमिन सीकडे अधिक लक्ष गेले आहे.

रोजच्या जेवणात हे हवेच

पालेभाज्या व कडधान्यांचा वापर करावा. आहारात मसाले कमी वापरावेत. हळदीचे दूध प्यावे. हळद, दूध आणि पाण्याचे मिश्रण उकळून घेऊन हळद दूध करावे. कोरोनामुक्त झाल्यानंतर अशक्तपणा येण्याचा संभव असतो. त्यामुळे गिलके, दोडके, भोपळा, पडवळ अशा भाज्यांचा आहारात वापर करावा. मूग, उडीद व मसूर डाळीचा आहारात वापर केल्यास प्रकृती सुदृढ राहते. अंडी हा प्रोटिन्सचा उत्तम स्रोत आहे.

कच्च्या भाज्या, कडधान्य पोषणाचा खजिना

कोरोनामुळे अनेक कुटुंबे दररोजच्या आहारात कच्च्या भाज्या व कडधान्यांचा आवर्जून समावेश करू लागले. कडधान्ये पचायला सोपी असतात. जीवनसत्त्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. कडधान्ये मोड आणून चांगली शिजवली तर ट्रिप्सिन इनहिबीटरसारख्या घटकांचा नाश होतो. शिजविताना आमसूल व चिंच यासारखे आंबट पदार्थ टाकण्याकडे गृहिणींचा कल वाढला आहे. कच्च्या भाज्या वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे.

कोट

आहार चांगला असला तरच प्रकृती निरोगी राहू शकते. कोरोना संसर्गामुळे कुटुंबाची काळजी वाढली. तेव्हापासून आहारातही बदल करावे लागले. सकाळी मुले घेत असलेल्या दुधापासून तर जेवणापर्यंत सर्वांनी सतर्क राहावे. आरोग्याला पोषक पदार्थच तयार करावे.

- संघू खैरे, विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर