शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र कोरोना अद्याप पूर्णत: गेला नाही. त्यामुळे या कालावधीत रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी ...

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र कोरोना अद्याप पूर्णत: गेला नाही. त्यामुळे या कालावधीत रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी सहजपणे उपलब्ध होणारा ताजा आणि सकस आहार कोरोनाच नव्हे तर कोणत्याही आजारांवर मात करण्यास उपयुक्त ठरू शकतो. उत्तम आहाराच्या जोरावरच प्रतिकारकशक्ती सुदृढ राहू शकते, ही जाणीव खऱ्या अर्थाने गृहिणींमध्येच रुजली आहे. कोरोनानंतर त्या अधिक सजग झाल्या एवढाच काय तो फरक. गृहिणी आता बाहेरचे अन्न (विशेषत: कच्चे अन्न, रस्त्याच्या कडेला असलेले खाद्य) आणि थंड पदार्थ टाळत आहेत. त्याऐवजी भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, गरम पेये (सूप, गरम पाणी, वरण, काढा घेण्यास कुटुंबाला प्रोत्साहन देत आहेत. तुळस, हळद, पुदीना, लवंगा यासारख्या घशाला आराम देणाऱ्या पदार्थांचा काढा पिण्याचे प्रमाणही आत घरोघरी वाढत असल्याची माहिती चंद्रपुरातील बालाजी वॉर्डातील सुगरण गृहिणी स्मिता चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.

फास्ट फूडवर अघोषित बंदी

हजारो कुटुंंबांच्या घरातील व्यक्तींना कोरोना होऊन गेला. त्यामुळे यापुढचा आहार कसा असावा, याबाबत जागरूकता वाढली.

साखर, मीठ व मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांबाबत गृहिणी आता विचार करू लागल्या. फास्ट फूडऐवजी सकाळी च्यवनप्राश, आवळा शरबत, आवळा कँडी, किवी व अन्य एखादे फळ खाण्याला पसंती दिली जात आहे. कोरोना प्रतिबंधासाठी गृहिणींचे व्हिटॅमिन सीकडे अधिक लक्ष गेले आहे.

रोजच्या जेवणात हे हवेच

पालेभाज्या व कडधान्यांचा वापर करावा. आहारात मसाले कमी वापरावेत. हळदीचे दूध प्यावे. हळद, दूध आणि पाण्याचे मिश्रण उकळून घेऊन हळद दूध करावे. कोरोनामुक्त झाल्यानंतर अशक्तपणा येण्याचा संभव असतो. त्यामुळे गिलके, दोडके, भोपळा, पडवळ अशा भाज्यांचा आहारात वापर करावा. मूग, उडीद व मसूर डाळीचा आहारात वापर केल्यास प्रकृती सुदृढ राहते. अंडी हा प्रोटिन्सचा उत्तम स्रोत आहे.

कच्च्या भाज्या, कडधान्य पोषणाचा खजिना

कोरोनामुळे अनेक कुटुंबे दररोजच्या आहारात कच्च्या भाज्या व कडधान्यांचा आवर्जून समावेश करू लागले. कडधान्ये पचायला सोपी असतात. जीवनसत्त्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. कडधान्ये मोड आणून चांगली शिजवली तर ट्रिप्सिन इनहिबीटरसारख्या घटकांचा नाश होतो. शिजविताना आमसूल व चिंच यासारखे आंबट पदार्थ टाकण्याकडे गृहिणींचा कल वाढला आहे. कच्च्या भाज्या वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे.

कोट

आहार चांगला असला तरच प्रकृती निरोगी राहू शकते. कोरोना संसर्गामुळे कुटुंबाची काळजी वाढली. तेव्हापासून आहारातही बदल करावे लागले. सकाळी मुले घेत असलेल्या दुधापासून तर जेवणापर्यंत सर्वांनी सतर्क राहावे. आरोग्याला पोषक पदार्थच तयार करावे.

- संघू खैरे, विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर