शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आधारभुत केंद्रात ऑनलाईन नोंदणीतील १४२० पैकी ४०५ शेतकऱ्यांबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

मूल : कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे असलेल्या आधारभूत केंद्रावर यावर्षी ३६ हजार क्किंटल धान शेतकऱ्यांनी आणले होते. ...

मूल : कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे असलेल्या आधारभूत केंद्रावर यावर्षी ३६ हजार क्किंटल धान शेतकऱ्यांनी आणले होते. यात १४२० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. ३१ मार्चपर्यंत फक्त १०१५ शेतकऱ्यांनी शेतमाल आणला. ४०५ शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रात सूचना देऊनही धान आणले नाही. मग त्या ४०५ शेतकऱ्यांनी आडमार्गाने बोनस हडपण्याच्या उद्देशाने ऑनलाईन नोंदणी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आधारभूत केंद्रात धान आधारभूत किमतीसोबतच बोनससुद्धा मिळत असल्याने आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली असल्याचे दिसून आले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे असलेल्या गोदामात शेतमाल भरला असल्याने त्या मालाची उचल करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी सूचना देत नाही तोपर्यत धानाची तोलाई बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने घेतला होता. त्यावेळी शेतकऱ्यांची केविलवाणी स्थिती झाली होती. मात्र प्रशासनाने यात लक्ष घातल्याने तोलाई सुरू करण्यात आली होती. बाजार समिती मूल येथे असलेल्या आधारभूत केंद्रावर १४२० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. मात्र प्रत्यक्षात १०१५ शेतकऱ्यांनी ३६ हजार क्किंटल धान आणले. त्यामुळे २३ नोव्हेंबर २० ते ३१ मार्च २१ पर्यंत सर्व शेतकऱ्यांना हमी भावानुसार १८६८ रुपये प्रती क्किंटलप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. उर्वरित ४०५ शेतकरी ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली मात्र धान तोलाईसाठी आधारभूत केंद्रात आणले नाही. यावरुन ४०५ शेतकऱ्यांनी आडमार्गाने बोनस मिळण्याच्या लालसेपोटी ऑनलाईन नोंदणी केली असावी. मात्र त्यांचा डाव फसल्याने ते आधारभूत केंद्रात धान आणू शकले नाही. एकंदरीत ते बोगस शेतकरी असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. यापुढे ऑनलाईन नोंदणी करताना खातरजमा करुनच नोंदणी करण्यात आली, तर खरे शेतकरी हमीभावापासून वंचित राहणार नाही.