शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

संविधान सन्मान रॅलीतून एकात्मतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:47 IST

भारतीय संविधान दिनानिमित्ताने समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षता मूल्यांचा समाजामध्ये प्रचार-प्रचार व्हावा या हेतूने समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या वतीने सोमवारी चंद्रपुरात संविधान सन्मान रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देहजारो नागरिक सहभागी : समता सैनिक दलाचे पथ संचलन ठरले लक्षवेधी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय संविधान दिनानिमित्ताने समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षता मूल्यांचा समाजामध्ये प्रचार-प्रचार व्हावा या हेतूने समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या वतीने सोमवारी चंद्रपुरात संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरूवात झाली. बौद्ध भिखु संघाच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी रॅली राष्ट्रध्वज दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, मुख्य संयोजक प्रवीण खोबरागडे आदी उपस्थित होते. भारतीय संविधानाने देशातील जनतेच्या विकासाचा मूलभूत दस्तावेज आहे. ब्रिटीश सत्तेविरूद्धच्या अथक संघर्ष केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. नव्या भारताची पूनर्रचना करण्यासाठी संविधानाने दिशा दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केले. संविधानातील जीवनमूल्यांची समाजात रूजवणूक व्हावी, याकरिता सोमवारी काढण्यात आलेल्या संविधान सन्मान रॅलीत समता सैनिक दलाचे पथ संचालन, संविधान रथ तसेच तिरंगा वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक आकर्षणाचा विषय ठरला. आदिवासी, बांगला व गरबा नृत्यासोबतच पंजाबी ढोल वाद्याने शहर दणाणले. भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या प्रबोधनात्मक देखाव्यांमुळे संविधान सम्मान रॅलीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत शहरातील विविध वॉर्डातील बौद्धविहार आणि आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते, शीख समाज, आदिवासी समाज, मुस्लीम, ओबीसी बहुजनातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. अ‍ॅड. सत्यविजय उराडे, अशोक निमगडे, नेताजी भरणे, विशाल अलोने, अशोक टेंभरे, डॉ. बंडू रामटेके, पप्पू देशमुख, स्नेहल रामटेके समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.भीमगीतांद्वारे जनतेचे प्रबोधनगांधी चौकातून निघालेली संविधान सन्मान रॅली जयंत टॉकीज चौक, जटपुरा गेट ते प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चौकातून वळसा घेऊन जटपुरा गेट, कस्तूरबा रोड, गिरनार चौक मार्गाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचली. त्यानंतर रॅलीचे रूपांतर सभेत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत भीमगीतांनी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.संविधानामुळे सर्वांना समान अधिकार- अहीरभारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करताना ते बोलत होते. आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेविका सविता कांबळे, मनपा गटनेते वसंत देशमुख, नगरसेवक संदीप आवारी, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेविका वंदना तिखे, पुष्पा उराडे आदींची उपस्थिती होती. २६ नोव्हेंबर १९४९ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित घटनेच्या मसुदा समितीने भारतीय संविधान देशाला अर्पण केले. हा दिवस संपूर्ण देशभर संविधान दिवस म्हणुन साजरा केला जातो. त्या पवित्र दिवसाचे स्मरण करून आदरांजली वाहण्यास उपस्थित झाल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले. अन्य मान्यवरांनीही संविधान निर्मात्यांना अभिवादन केले.भारतीय संविधानावर विचारमंथनडॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी पाच वाजता ‘भारतीय संविधान व लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर प्रबोधन सभा झाली. अध्यक्षस्थानी डॉ. विवेक बांबोळे तर प्रमुख वक्ते अ‍ॅड. फि रदोस मिर्झा, डॉ. दिलीप बारसागडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, चमकौरसिंग बसरा आदींनी विचार मांडले. विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. रात्री भारतीय संविधान व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला.