शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उद्योगांचा आढावा चंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला. या काळात अनेकांचे ...

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उद्योगांचा आढावा

चंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला. या काळात अनेकांचे रोजगार गेलेच, पण अर्थव्यवस्थेची गतीसुध्दा मंदावली. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी राज्य शासनाने आता कोरोनाच्या काळातसुध्दा उद्योग सुरू राहील, याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही जिल्ह्यातील उद्योग सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली 'उद्योग टास्क फोर्स'ची स्थापना करण्यात आली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्योगांवर होणारा विपरीत परिणाम टाळणे, यादरम्यान उद्योग सुरू राहावेत, तसेच उद्योगांच्या ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, एमआयडीसी औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांच्यासह उद्योग संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उद्योग सुरळीत सुरू राहण्यासाठी उद्योगांनी आपापल्या कार्यक्षेत्रातच कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करावी. जे कर्मचारी बाहेर राहात असतील, त्यांच्यासाठी उद्योगाने ने - आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी. ज्या उद्योगांकडे वाहने नसतील, त्यांनी परिवहन मंडळाकडून बसेस घ्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला डब्ल्यूसीएलचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक, माणिकगड तसेच एसीसी सिमेंटचे प्रतिनिधी यांच्यासह इतरही उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बाॅक्स

नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करा

सर्व उद्योगांनी विलगीकरण कक्ष, तपासणी कक्ष, लसीकरण केंद्र स्वत: उभारावेत, उद्योगांमध्ये कोरोना वर्तणूकविषयक बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, नियमित मास्कचा वापर, सामाजिक अंतर, वारंवार हात स्वच्छ धुणे आदींचा समावेश आहे. यासाठी कंपन्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.