शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

साथीच्या आजारांचे खापर वटवाघुळांवर फोडणे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 07:00 IST

मानवी हस्तक्षेप दुर्लक्षित करून साथीच्या आजारांचे खापर केवळ वटवाघुळांवरच फोडणे सुरू राहिल्यास जगभरातील वटवाघुळांच्या वसाहती उद्ध्वस्त होतील, असा दावा ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव व वटवाघूळ अभ्यासक अनिरूद्ध चावजी यांनी लोकमतशी बोलताना केला.

ठळक मुद्देजगभरातील वटवाघुळांच्या वसाहती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय आणि जगाच्या पाठीवरील काही देशांमध्ये वटवाघूळ हा निरूपद्री, दिसायला अत्यंत कुरूप, झाडाला उलटा लटकणारा व रात्री संचार करणारा निशाचर म्हणून अशास्त्रीय व विविध धर्मप्रेरित मिथकांचा सातत्याने बळी ठरत आला आहे. वटवाघूळ स्वत:हून कुणाच्या वाट्याला जात नाही. त्याची उपयुक्तता सर्वविदीत आहे. बहुतांश प्राणी-पक्ष्यांमध्ये विषाणू असतात, वटवाघूळातही आहेत. निपाह व्हायरसपासून तर कोरोना व्हायरससाठी वटवाघुळेच जबाबदार असल्याचे अद्याप सिद्ध झाले नाही. मात्र, मानवी हस्तक्षेप दुर्लक्षित करून साथीच्या आजारांचे खापर केवळ वटवाघुळांवरच फोडणे सुरू राहिल्यास जगभरातील वटवाघुळांच्या वसाहती उद्ध्वस्त होतील, असा दावा ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव व वटवाघूळ अभ्यासक अनिरूद्ध चावजी यांनी लोकमतशी बोलताना केला.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भारतात, महाराष्ट्रात व जगभरात वटवाघूळ अभ्यासक्षेत्रात नेमके काय चालले आहे, यासंदर्भात माहिती देताना अनिरूद्ध चावजी म्हणाले, वटवाघूळांच्या जगात १११, भारतात १२९ आणि महाराष्ट्रात सुमारे ५० जाती आहेत. प्राणीशास्त्रानुसार वटवाघूळांचे मायक्रोबॅट व मेगाबॅट या दोन प्रकारात वर्गीकरण केल्या जाते. त्यामध्ये कीटकभक्ष्यी व फळभक्ष्यी या प्रकारांना अतिशय महत्त्व आहे. वटवाघूळांच्या पंखांना बोटं व उपांग असतात. कान तीक्ष्ण असतात. त्या साधारणत: २० किमी उडू शकतात. वटवाघूळांवर विषाणूंचा फारसा अनिष्ट परिणाम होत नसल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून आढळून आले आहे. ते स्वत: आजारी न पडता कित्येक प्रकारच्या विषाणूंना आश्रय देऊ शकतात. इबोला, निपाह आणि आता कोरोनासारख्या प्राणीजन्य आजारांच्या विषाणूंचे यजमानही तेच असल्याचा केवळ संशय घेतला जात आहे. पण अद्याप सिद्ध झाले नाही, असेही चावजी यांनी सांगितले.वटवाघूळांची उपयोगितावटवाघूळांमध्ये २० टक्के फळभक्षी व ८० कीटकभक्षी असतात. फळभक्षी वटवाघूळांमुळे निसर्गाची परिसंस्था निरोगी राहते. बहुविध फळ-झाडांची बियाणे रूजविण्याचे काम वटवाघूळांकडून विष्ठेद्वारे होते. हा उडणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. वटवाघूळे मार्गक्रमण व शिकारीसाठी प्रतिध्वनी स्थाननिर्धारण तंत्र म्हणजे इको-लोकेशनचा वापर करतात. या तंत्राद्धारे एका तासात १,२०० व एका रात्री सहा ते सात हजार डासांच्या आकाराचे किटक खाऊ शकतात. रात्री अंधारात पाण्यातून मासे पकडू शकतात, इतके चित्तथरारक तंत्रज्ञान त्याला अवगत आहे. नाईट व्हीजन कसे असते, हे मानवाने वटवाघूळाकडून शिकण्याची गरज आहे, अशी माहिती चावजी यांनी दिली.चुका मानवाच्या, आरोपीच्या पिंजऱ्यात वटवाघूळ२०१९ मध्ये सार्स कोविड-२ या आजाराची साथ आली होती. तिचा संबंध चीनच्या वुहानमधील माणसांना खाण्यासाठी मांडलेल्या जिवंत प्राण्यांच्या वेट मार्केट शी असल्याचे मानले जाते. मात्र, नंतर झालेल्या अभ्यासातून त्या रोगाचा प्रसारस्त्रोत अन्य प्राण्यांत आढळल्याचे सिद्ध झाले. यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की हे प्राणी अशा बाजारात आणले कुणी. खरे तर मानवाचा आणि वटवाघूळांचा अधिवास पूर्णत: वेगळा आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील ओले बाजार बंद करा, अशा सूचना दिल्या आहेत. वटवाघूळांच्या वसाहती उद्ध्वस्त झाल्या तर किटकांची संख्या प्रचंड वाढेल. यातून पिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊन मानवी जीवनावर दुष्परिणाम होईल. त्यामुळे मानवाने चुका टाळून वटवाघूळांना आरोपीच्या पिंजºयात टाकण्यापेक्षा निसर्गातील हस्तक्षेप टाळला पाहिजे, असा सल्ला अनिरूद्ध चावजी यांनी दिला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस