शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

साथीच्या आजारांचे खापर वटवाघुळांवर फोडणे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 07:00 IST

मानवी हस्तक्षेप दुर्लक्षित करून साथीच्या आजारांचे खापर केवळ वटवाघुळांवरच फोडणे सुरू राहिल्यास जगभरातील वटवाघुळांच्या वसाहती उद्ध्वस्त होतील, असा दावा ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव व वटवाघूळ अभ्यासक अनिरूद्ध चावजी यांनी लोकमतशी बोलताना केला.

ठळक मुद्देजगभरातील वटवाघुळांच्या वसाहती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय आणि जगाच्या पाठीवरील काही देशांमध्ये वटवाघूळ हा निरूपद्री, दिसायला अत्यंत कुरूप, झाडाला उलटा लटकणारा व रात्री संचार करणारा निशाचर म्हणून अशास्त्रीय व विविध धर्मप्रेरित मिथकांचा सातत्याने बळी ठरत आला आहे. वटवाघूळ स्वत:हून कुणाच्या वाट्याला जात नाही. त्याची उपयुक्तता सर्वविदीत आहे. बहुतांश प्राणी-पक्ष्यांमध्ये विषाणू असतात, वटवाघूळातही आहेत. निपाह व्हायरसपासून तर कोरोना व्हायरससाठी वटवाघुळेच जबाबदार असल्याचे अद्याप सिद्ध झाले नाही. मात्र, मानवी हस्तक्षेप दुर्लक्षित करून साथीच्या आजारांचे खापर केवळ वटवाघुळांवरच फोडणे सुरू राहिल्यास जगभरातील वटवाघुळांच्या वसाहती उद्ध्वस्त होतील, असा दावा ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव व वटवाघूळ अभ्यासक अनिरूद्ध चावजी यांनी लोकमतशी बोलताना केला.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भारतात, महाराष्ट्रात व जगभरात वटवाघूळ अभ्यासक्षेत्रात नेमके काय चालले आहे, यासंदर्भात माहिती देताना अनिरूद्ध चावजी म्हणाले, वटवाघूळांच्या जगात १११, भारतात १२९ आणि महाराष्ट्रात सुमारे ५० जाती आहेत. प्राणीशास्त्रानुसार वटवाघूळांचे मायक्रोबॅट व मेगाबॅट या दोन प्रकारात वर्गीकरण केल्या जाते. त्यामध्ये कीटकभक्ष्यी व फळभक्ष्यी या प्रकारांना अतिशय महत्त्व आहे. वटवाघूळांच्या पंखांना बोटं व उपांग असतात. कान तीक्ष्ण असतात. त्या साधारणत: २० किमी उडू शकतात. वटवाघूळांवर विषाणूंचा फारसा अनिष्ट परिणाम होत नसल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून आढळून आले आहे. ते स्वत: आजारी न पडता कित्येक प्रकारच्या विषाणूंना आश्रय देऊ शकतात. इबोला, निपाह आणि आता कोरोनासारख्या प्राणीजन्य आजारांच्या विषाणूंचे यजमानही तेच असल्याचा केवळ संशय घेतला जात आहे. पण अद्याप सिद्ध झाले नाही, असेही चावजी यांनी सांगितले.वटवाघूळांची उपयोगितावटवाघूळांमध्ये २० टक्के फळभक्षी व ८० कीटकभक्षी असतात. फळभक्षी वटवाघूळांमुळे निसर्गाची परिसंस्था निरोगी राहते. बहुविध फळ-झाडांची बियाणे रूजविण्याचे काम वटवाघूळांकडून विष्ठेद्वारे होते. हा उडणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. वटवाघूळे मार्गक्रमण व शिकारीसाठी प्रतिध्वनी स्थाननिर्धारण तंत्र म्हणजे इको-लोकेशनचा वापर करतात. या तंत्राद्धारे एका तासात १,२०० व एका रात्री सहा ते सात हजार डासांच्या आकाराचे किटक खाऊ शकतात. रात्री अंधारात पाण्यातून मासे पकडू शकतात, इतके चित्तथरारक तंत्रज्ञान त्याला अवगत आहे. नाईट व्हीजन कसे असते, हे मानवाने वटवाघूळाकडून शिकण्याची गरज आहे, अशी माहिती चावजी यांनी दिली.चुका मानवाच्या, आरोपीच्या पिंजऱ्यात वटवाघूळ२०१९ मध्ये सार्स कोविड-२ या आजाराची साथ आली होती. तिचा संबंध चीनच्या वुहानमधील माणसांना खाण्यासाठी मांडलेल्या जिवंत प्राण्यांच्या वेट मार्केट शी असल्याचे मानले जाते. मात्र, नंतर झालेल्या अभ्यासातून त्या रोगाचा प्रसारस्त्रोत अन्य प्राण्यांत आढळल्याचे सिद्ध झाले. यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की हे प्राणी अशा बाजारात आणले कुणी. खरे तर मानवाचा आणि वटवाघूळांचा अधिवास पूर्णत: वेगळा आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील ओले बाजार बंद करा, अशा सूचना दिल्या आहेत. वटवाघूळांच्या वसाहती उद्ध्वस्त झाल्या तर किटकांची संख्या प्रचंड वाढेल. यातून पिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊन मानवी जीवनावर दुष्परिणाम होईल. त्यामुळे मानवाने चुका टाळून वटवाघूळांना आरोपीच्या पिंजºयात टाकण्यापेक्षा निसर्गातील हस्तक्षेप टाळला पाहिजे, असा सल्ला अनिरूद्ध चावजी यांनी दिला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस