विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST2021-03-17T04:29:14+5:302021-03-17T04:29:14+5:30
झुडपांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले जिवती : जिल्ह्यात अनेक भागात डोंगराळ मार्ग आहे. त्यातच काही वळण मार्गावर झुडप वाढली आहे. ...

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
झुडपांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले
जिवती : जिल्ह्यात अनेक भागात डोंगराळ मार्ग आहे. त्यातच काही वळण मार्गावर झुडप वाढली आहे. त्यामुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही. अनेकदा येथे अपघातही घडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.
प्लॅस्टिकवर बंदी केवळ नावापुरती
चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. शहरातील गंजवॉर्ड, गोलबाजार, भिवापूर सुपर मार्केट व अन्य बाजाराच्या ठिकाणी गरज नसताानाही प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकांना दिल्या जात आहे. या पिशव्या कुठेही टाकून देण्यात येत असल्याने पर्यावरणास धोका आहे.
डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डामध्ये डुक्करांच्या हैदोस वाढला आहे. त्यामुळे परिसरातील जनता त्रस्त आहे. डुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नाल्या तुंबल्याने आरोग्य धोक्यात
गोंडपिपरी: तालुक्यातील बहुतांश गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाल्यांचा उपसा करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
वाहतूक शिपायाची नियुक्ती करा
चंद्रपूर : शहरातील काही शाळा महाविद्यालय मुख्य मार्गावर आहेत. अनेकवेळा मुलांना शाळेत जाण्याची घाई असते. अशावेळी शाळा परिसरात अपघात होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारचे अनेक अपघात आतापर्यंत घडले असल्याने त्यामुळे शाळेजवळ वाहतूक शिपायाची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.