भंगार व्यवसायामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:23+5:30

भंगार व्यवसाय गांधी वार्ड क्रमांक ४ मध्ये सुरू असून या व्यवसायामुळे अस्वच्छता, डासांची उत्पत्ती, ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर अनेक समस्या निर्माण होतात.

Citizens suffer due to debris business | भंगार व्यवसायामुळे नागरिक त्रस्त

भंगार व्यवसायामुळे नागरिक त्रस्त

ठळक मुद्देअस्वच्छता वाढल्याचा आरोप : तहसीलदाराला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरी : येथील गांधी वार्ड क्रमांक ४ मधील नागरिकांना भंगार व्यवसायामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या तातडीने दूर करण्याची मागणी तहसीलदाराकडे नागरिकांनी केली आहे.
भंगार व्यवसाय गांधी वार्ड क्रमांक ४ मध्ये सुरू असून या व्यवसायामुळे अस्वच्छता, डासांची उत्पत्ती, ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा व्यवसाय अन्यत्र हलवावा, अशी मागणी नेरी येथील नागरिकांनी तहसीलदाराकडे केली. नागरिकांच्या हितासाठी तहसीलदार भंगार व्यावसायिकांवर काय पाऊल उचलतात, याकडे नेरीवाशींचे लक्ष लागले आहे.

Web Title: Citizens suffer due to debris business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.