पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती

By Admin | Updated: April 27, 2016 00:53 IST2016-04-27T00:53:43+5:302016-04-27T00:53:43+5:30

औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालक्यामध्ये अनेक गावात पाणी टंचाई दिसून येत आहे.

Citizens' pollination | पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती

पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती

पाणी पुरवठा समित्या कागदावरच : मुदत संपूनही कंत्राटदारांनी केले नाही काम
नांदाफाटा : औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालक्यामध्ये अनेक गावात पाणी टंचाई दिसून येत आहे. तालुक्यातील कोट्यवधीच्या पाणीपुरवठा योजना अपयशी ठरल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण भटकंती करावी आहे.
याचबरोबर तालुक्यात १९९८ मध्ये ५३ गावांसाठी सुरू झालेली पाणी पुरवठा योजना नांदा व गडचांदूर वगळता इतर गावात अपयशी ठरली आहे. कित्येक वर्षांपासून पाईपलाईन दुरुस्ती न झाल्याने गावात पाणीच मिळत नसल्याचा प्रकार दिसत आहे. शासनाने गावातील पाणी टंचाई निवारण्यासाठी गावपातळीवर पाणी व्यवस्थापन समित्या नेमण्याचे ग्रामपंचायतीला याआधीच निर्देश दिले आहे. या समितीला निविदा काढणे, पाणी परीक्षण करणे, खर्चाची मंजुरी देणे, कंत्राटदार नेमणे, नळयोजनेचे काम आदी अधिकार देण्यात आले आहे. मात्र काही गावांमध्ये सोयीच्या कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे. त्यामुळे मुदत संपूनही काम पूर्ण झाले नसल्याचे चित्र दिसते. तालुक्यात कोडशी (खुर्द), शेरज, माथा, कुकडबोरी, कातलाबोडी, लखमापूर, गडचांदूर, हातलोणी, कवठाळा, कान्हाळगाव, मांडवा आदी गावांमध्ये पााणी टंचाईची झळ अधिक आहे. काही गावांमध्ये एकाच कामासाठी चारचार योजनेतून काम करण्यात आले. यात लाखो रुपये खर्च करुनही गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. हा प्रकार आदिवासी वस्ती असलेल्या मांगलहिरा येथे दिसून येते. त्याचबरोबर सन २०१३-१४ मध्ये सौरपंपावर आधारित नळयोजना व विविध गावांमध्ये फिल्टर मशीन बसविण्यात आल्या. मात्र एकदा बिघडलेल्या सौरपंपाकडे व फिल्टर मशीनकडे कुणीही ढुंकून पाहले नाही. त्यामुळे ही योजनाही यशस्वी ठरली नाही. यातील पाकडहिरा हे गाव वगळता कान्हाळगाव, तानबाडी कोडशी या गावात योजनेला यश आले नाही. परिणामी ााणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)

अमलनाल्याचे पाणी कंपनीच्या घशात
सध्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या लखमापूर, गडचांदूर या गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या आहे. सदर गावे माणिकगड सिमेंट कंपनीलगत आहे. मात्र या गावांना कंपनीकडून पाणी पुरवठा होत नसल्याचेही दिसते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी घेता यावे, यासाठी अंमलनाला व पकडीगुड्डम धरण बांधण्यात आले. यातील उपलब्ध पाण्याचा मोठा साठा सिमेंट कंपन्या उपसा करीत आहे. मात्र दत्तक गावातील पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रयत्नही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. धरणाच्या पाण्यावर स्वत:चे वीज प्रकल्प चालविताना नागरिकांच्या हक्काचे पाणी कंपन्या घेत आहे. मात्र गावात पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, ही शोकांतिका आहे. तेव्हा लोककल्याणासाठी वापरण्यात येणारा माणिकगड सिमेंट कंपनीचा सीएसआर निधी जातोय कुठे, असा सवाल भाजपा नेते आबीद अली यांनी केला आहे

Web Title: Citizens' pollination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.