शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी जिवती तालुक्यातील नागरिकांची वणवण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 15:12 IST

नळयोजना ठप्प : हातपंप बंद; माणिकगड पहाडावर विकत घ्यावे लागते पाणी !

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : पावसाळ्यात शहरातील व्यक्तीने अचानक माणिकगड पहाडावरील गावांना भेट दिली की तिथले नैसर्गिक सौंदर्य पाहून हुरळून जातात. मात्र, उन्हाळ्यात येथील माणसे पाण्याविना कशी होरपळतात, याचा साधा मागमूसही त्यांना नसतो. जिवती तालुक्यातील १४७ पैकी दोन वर्षात फक्त १८ कामे पूर्ण झाली. येल्लापूर हे टंचाईग्रस्त गावांपैकी जिल्ह्यातील एक प्रातिनिधिक गाव. येथील नळयोजना आठ महिन्यांपासून ठप्प, विहीर ढासळलेली, १५० ते २०० रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागते. जलजीवन मिशन योजनेने गावकऱ्यांचा अपेक्षाभंग केल्याची येल्लारपूरची व्यथा आहे.

मार्च महिना लागताच माणिकगड पहाडावर पाणीटंचाईची चाहूल सुरू होते. एप्रिल, मे, जून म्हणजे प्रचंड यातना हे आजवरचे चित्र कधी बदलले नाही. येल्लापूरसह अनेक गावांतील विहिरी कोरड्या झाल्या आहेत.

गावकऱ्यांना नेमके काय हवे ?तलावाखालील विहिरींना भरपूर पाणी लागते. त्यामुळे शासनाने विहीर खोदताना येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा. हातपंपही उपयुक्त ठरू शकतात; पण काही हातपंप चुकीच्या ठिकाणी खोदण्यात आली. गावातील विहिरींचे पारंपरिक जलस्रोत व सोबतीला जलजीवन मिशन योजना यशस्वीपणे राबवली, तर उन्हाळ्याची अडचण दूर होऊ शकते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

पाणी मिळत नसल्याने काही कुटुंबे उन्हाळ्यात सोडतात गावपहाडावरील अनेक गावांत जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत कोट्यवधी खर्च झाले; परंतु पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे काही कुटुंब उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येने काही महिने गाव सोडतात व पावसाळ्यात परत येतात. येल्लापूर हेही त्यापैकीच एक गाव. जलजीवन मिशनची कामे अर्धवट पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

रात्री-बेरात्री महिलांची पायपीटएकच विहिरीतील पाणी पिण्यायोग्य असल्याने बैलबंडी, ऑटो किवा दुचाकीच्या साहाय्याने पाणी आणून तहान भागवतात. ज्यांच्याकडे ही साधने नाहीत त्यांना पाण्यासाठी ४०० मीटर दूर पायपीट करावी लागते. प्रसंगी पहाडाखालील गावांतून २०० लिटर पाण्यासाठी १५० ते २०० रुपये मोजावे लागतात. महिलांना पाण्यासाठी रात्री-बेरात्री उठावे लागते.

पाच हातपंप नावापुरतेच !गावात पाच हातपंप आणि सहा विहिरी आहेत; पण तलावाखालील एकाच विहिरीला पाणी आहे. उर्वरित सर्वच विहिरींनी तळ गाळला, पाणी मिळणे कठीण झाले. जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत सुरू असलेला पाणीपुरवठा आठ महिन्यांपासून बंद आहे, गावाजवळील आणखी एक विहीर खूप उपयुक्त होती. ती ढासळून एक वर्षाचा कालावधी लोटला; पण प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.

जलजीवन मिशनच्या कामाचा पाठपुरावा करताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एप्रिलमध्ये काम पूर्ण होईल, असे सांगितले होते; परंतु तसे होऊ शकले नाही. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. - सुमित्रा मेश्राम, सरपंच, ग्रामपंचायत, येल्लापूरकोट

मागील आठ महिन्यांपासून गावातील नळयोजना बंद आहे. पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले. हा दरवर्षीचा त्रास कधी दूर होईल, याची महिला वाट पाहत आहेत. सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी.-इंदू शिनगारे, गृहिणी, येल्लापूर

पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पहाडावर वरपांगी कामे उपयोगाची नाहीत.ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी विहिरी खोदाव्यात. उन्हाळ्यापूर्वीच योग्य तयारी करून योजना अमलात आणावी.- प्रशांत कांबळे, सदस्य, ग्रा. पं. येल्लापूर 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर