नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By Admin | Updated: May 25, 2014 23:28 IST2014-05-25T23:28:23+5:302014-05-25T23:28:23+5:30

मागील काही दिवसांपासून शहरातील काही वार्डात अशुद्ध तसेच अनियमित पाणी पुरवठा सुरु आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलवाहित्या त्वरित बदलवून

Citizen Health Games | नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील काही वार्डात अशुद्ध तसेच अनियमित पाणी पुरवठा सुरु आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलवाहित्या त्वरित बदलवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा मागणी करण्यात आली आहे.

आठ वर्षापूर्वी चंद्रपूर नगरपालिका असताना शहरात पाणीपुरवठा करण्याचा कंत्राट खासगी कंपनीकडे देण्यात आले. शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, फुटलेल्या जलवाहिन्यांची त्वरित दुरुस्ती करणे, शिवाय जनतेकडून पाणीपट्टी कराची परस्पर उचल करणे आदींची नोंद यावेळी कंपनीसोबत झालेल्या करारात झाली होती. त्यानंतर आता दुसर्‍या कंपनीकडे मनपाने कंत्राट दिले आहे.

इरई धरणातील पाणी तुकुम भागातील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचविले जाते. त्यानंतर हे शुद्ध केलेले पाणी टाकीत पोहोचविण्याकरिता शहरात जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु ही जलवाहिनी एक किलोमीटर अंतरावर अनेक ठिकाणी फुटली आहे. मागील काही वर्षांंपासून फुटलेल्या जलवाहिनीची थातुरमातूर दुरुस्ती करण्यात आली. या फुटलेल्या जलवाहिनीला पर्याय म्हणून चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेने एक कोटी रुपये खर्चाची दुसरी जलवाहिनी टाकली. सदर जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला, तरीही अशुद्ध पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सुटला नाही. दर वर्षाला पाणीपट्टी कर म्हणून ग्राहकाकडून मोठय़ा प्रमाणात वसूल केल्या जातो. मात्र त्यांना त्या तुलनेत पुरेसे पाणी पुरवठा केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एकीकडे फुटलेल्या जलवाहिनीद्वारे घराघरात अशुद्ध पाणी पोहचविले जाते तर, दुसरीकडे ज्या टाकीत पाण्याची साठवणूक होते ती टाकी कित्येक वर्षांंपासून स्वच्छ केली नाही. महानगरपालिकेकडून होणार्‍या दुर्लक्षामुळे चंद्रपुरातील जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.

शहरातील सर्व प्रभागामध्ये नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची ओरड आहे. त्यातच काही नागरिक नळाला टिल्लू पंप लावत असल्याने अन्य नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नळ सोडण्याच्या वेळी विशेष मोहीम राबवून टिल्लू पंप लावणार्‍यांविरुध्द कारवाई करणे तेवढेच गरजेचे आहे. मात्र अशी कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी पाणी पुरवठा बंद असतो, त्या दिवशी नागरिकांना कोणत्याही प्रकारे सूचना देण्यात येत नाही. शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Citizen Health Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.