शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

चंद्रपूर  जिल्ह्यामध्ये चायनीज मांजामुळे वाढला अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 11:53 IST

Chandrapur News मकरसंक्रात आली की, पतंग उडविण्यासाठी चढाओढ सुरू होते. लहान-मोठे सर्वच पतंग उत्सव साजरा करतात. यामध्ये अनेकजण चायनीज मांजा वापरतात. त्यामुळे पक्ष्यांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे.

ठळक मुद्दे महापालिका, पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था करणार कारवाई

 लोकमत न्यूज नेटवर्क  

चंद्रपूर : मकरसंक्रात आली की, पतंग उडविण्यासाठी चढाओढ सुरू होते. लहान-मोठे सर्वच पतंग उत्सव साजरा करतात. यामध्ये अनेकजण चायनीज मांजा वापरतात. त्यामुळे पक्ष्यांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे, तर अनेक वाहनांचे अपघातही होत आहे. दरम्यान, बाजारात लपून-छपून चायनीज मांजा विक्री सुरू आहे.

शासनाने चायनीज मांजावर बंदी घातली आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वास हा मांजा मिळत आहे. पक्षांसह मानवाच्या जिवावर बेतणारा हा मांजा वापरू नये, यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. दरम्यान, व्यावसायिकांनी किंवा नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर, विक्री करणाऱ्यांची माहिती मनपाला द्यावी त्यांच्यावर कारवाई करण्याचे महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. मागील काही वर्षांमध्ये अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागला आहे, तर दुचाकी, तसेच सायकस्वारांचेही अपघात झाले आहेत. त्यामुळे पतंग उडविण्यापूर्वी प्रत्येकांनी एकदा विचार करणे गरजेचे आहे. बंदी असलेला मांजा बाजारात सहज उपलब्ध होत असल्यामुळे कुणालाही यासंदर्भात फारसे गंभीर नाही.

मांजामुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू

चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यामध्ये या दिवसात मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. यासाठी बाराजात चायनीज पतंग, मांजा विक्रीसाठी दाखल होताे. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मात्र, दरवर्षी पक्ष्यांचा नाहक बळी जातो. अनेक पक्षी मृत झाले तरीही ते आपल्याला कळतसुद्धा नाही.

नायलाॅन मांजा विक्रेत्यांवर होणार कारवाई

चंद्रपूर महापालिकेने संयुक्त पथक तयार केले असून, या माध्यमातून नायलाॅन मांजा विक्रेत्यावर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात महापालिका उपआयुक्तांनी महापालिका अधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच स्वयंसेवी संस्थेची बैठक घेतली असून, पथकांचेही गठण केले आहे.

तुरुंगवासाचीही तरतूद

नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास तुरुंगवासाचीही तरतूद आहे. केवळ विक्रीची ठिकाणेच नाही, तर गोदामे, साठवणुकीची ठिकाणे, घरून विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

हा ठरावीक काळापुरता व्यवसाय आहे. व्यावसायिकांनी किंवा नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर, विक्री करणाऱ्यांची माहिती मनपास द्यावी, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मनपातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मकरसंक्रात आली की, पतंग उडविण्यासाठी चढाओढ सुरू होते. नायलॉन मांजा अधिक मजबूत असल्याने सारे याचीच निवड करतात. हा मांजा लवकर तुटत नसल्याने पतंग कटली की, रस्त्यावर हा मांजा पडतो. यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. दरवर्षी अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात आणि जखमी होतात. त्यामुळे बंदीची मागणी करण्यात आली आहे.

-बंडू धोतरे

अध्यक्ष, इको-प्रो

चंद्रपूर

टॅग्स :Healthआरोग्यAccidentअपघात