ग्रामीण विद्यार्थ्यांंंची शहरी विद्यार्थ्यांंंवर मात : गोंडपिपरी तालुका आघाडीवर तर भद्रावती मागे
चंद्रपूर
: महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ‘ऑन लाईन’ घोषित करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८७.६६ इतकी असून नागपूर विभागात चवथा क्रमांक आहे. २५ हजार ६२३ विद्यार्थ्यांंंनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी २५ हजार ५९२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यात २२ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ७0९ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ५ हजार ६६८ विद्यार्थी प्रथम, १४ हजार २८२ द्वितीय तर १ हजार ७७४ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.गोंडपिपरी
तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९१.९२ टक्के लागला आहे. ८३.३८ टक्केवारीसह भद्रावती तालुका पंधराव्या क्रमांकावर आहे. गतवर्षी शहरी विद्यार्थ्यांंंनी ग्रामीण विद्यार्थ्यांंंवर मात केली होती. यंदा तालुकानिहाय निकालाची टक्केवारी बघितल्यास ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांंंनी निकालात सरशी घेतल्याचे दिसून येते. चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी या शहरीभागापेक्षा गोंडपिपरी, मूल, पोंभूर्णा, जिवती सारख्या ग्रामीण तालुक्यांनी चांगला निकाल दिला आहे. विज्ञान
शाखेतून ८ हजार ५६९ विद्यार्थ्यांंंंनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ८ हजार ५५९ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ७ हजार ६६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांंंनी टक्केवारी ८९.५५ इतकी आहे. यामध्ये ३0५ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, १ हजार ६७८ प्रथम, ५ हजार २१६ द्वितीय, तर ४६६ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.कला
शाखेतून १३ हजार ५९७ विद्यार्थ्यांंंंनी नोंदणी केली होती. पैकी १३ हजार ५८५ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ११ हजार ७0२ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८६.१४ इतकी आहे. यामध्ये २७९ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, २ हजार ९६४ प्रथम, ७ हजार ३११ द्वितीय तर १ हजार १४८ तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य
शाखेतून एकूण १ हजार ९१४ विद्यार्थ्यांंंंनी परीक्षेसासाठी नोंदणी केली होती. पैकी १ हजार ९0९ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात १ हजार ७२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ९0.२0 इतकी आहे. यामध्ये १0१ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ५८६ प्रथम, ८९0 द्वितीय तर १४५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसी शाखेतून एकूण १ हजार ५४३ विद्यार्थ्यांंंंनी नोंदणी केली. पैकी १ हजार ५३९ विद्यार्थ्यांंंंनी परीक्षा दिली. त्यात १ हजार ३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८७.३३ इतकी आहे. २४ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ४४0 प्रथम, ८६५ द्वितीय तर १५ तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. (शहर प्रतिनिधी)१
00 टक्के निकाल देणार्या शाळा
सन्मित्र सैनिकी ज्यु. कॉलेज, चंद्रपूर
मारुती (विज्ञान) कनिष्ठ महाविद्यालय, कोठारी
कर्मवीर उच्च माध्यमिक विद्यालय, घोडपेठ
श्री. गजानन कला कनिष्ठ महाविद्यालय, कवठी, भद्रावती
ख्रिस्तानंद कनिष्ठ महाविद्यालय, ब्रह्मपुरी
स्व. सुधाकरराव नाईक आर्ट ज्यु. कॉलेज, तोहोगाव
श्री. शिवाजी इंग्लिश स्कुल, कोरपना
श्रीकृष्ण सायन्स ज्यु. कॉलेज, पोंभूर्णा
शासकीय पी.बी.ए. स्कुल अँण्ड ज्यु. कॉलेज, देवाडा (राजुरा)साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, विहीरगाव (राजुरा)प्रभाकरराव मामुलकर उच्च माध्यमिक विद्यालय, सोनापूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, देवाडा
भैय्याजी पाटील भांडेकर कनिष्ठ महाविद्यालय, कापसी
प्रियदर्शिनी कनिष्ठ महाविद्यालय, शेणगाव (जिवती)निकालात
यावर्षीच्या
वाणिज्य शाखा अव्वल बारावीच्या निकालात वाणिज्य शाखेचा निकाल इतर शाखेच्या तुलनेत अव्वल ठरला आहे. विज्ञान शाखेतून ७ हजार ६६५ विद्यार्थी