शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल @ ८३.५५

By admin | Updated: May 26, 2016 01:56 IST

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ‘आॅन लाईन’ घोषित करण्यात आला.

यंदाही मारली मुलींनीच बाजी : गतवर्षीच्या तुलनेत निकालात जिल्ह्याची घसरणचंद्रपूर : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ‘आॅन लाईन’ घोषित करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८३.५५ इतकी आहे. २७ हजार ९११ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी २७ हजार ८७६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यात २३ हजार २९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी बारावीचा ९२ टक्के निकाल लागला होता. त्यातुलनेत यंदा निकालात जिल्ह्याची घसरण झाल्याचे दिसून येते. चंद्रपूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८८.७५ टक्के लागला आहे. तर पोंभूर्णा तालुक्याचा निकाल सर्वात कमी ७०.६८ टक्के लागला. गतवर्षी ग्रामीण विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यांवर मात केली होती. यंदा तालुकानिहाय निकालाची टक्केवारी बघितल्यास शहरी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी निकालात सरशी घेतल्याचे दिसून येते. भद्रावती वगळता चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी वरोरा, राजुरा या शहरीभागातील विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण टक्केवारी ग्रामीण तालुक्यांच्या तुलनेत वाढविली आहे. विज्ञान शाखेतून ९ हजार ६५७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ९ हजार ६४८ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ९ हजार ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.६६ इतकी आहे. यामध्ये ४०८ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, २ हजार १५५ प्रथम, ५ हजार ९६९ द्वितीय, तर ५०४ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.कला शाखेतून १४ हजार ५४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १४ हजार ५३० विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ११ हजार १७८ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ७६.९३ इतकी आहे. यामध्ये २०२ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ३ हजार १२ प्रथम, ७ हजार १७३ द्वितीय तर ७९१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून एकूण २ हजार ७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसासाठी नोंदणी केली होती. पैकी २ हजार ७५ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात १ हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ८६.२७ इतकी आहे. यामध्ये ११८ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ५७६ प्रथम, ९३० द्वितीय तर १६६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसी शाखेतून एकूण १ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी १ हजार ६२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १ हजार २८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ७९.३० इतकी आहे. २२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यता, ५७० प्रथम, ६९३ द्वितीय तर २ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. (शहर प्रतिनिधी)निकालात विज्ञान शाखा अव्वलयावर्षीच्या बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा निकाल इतर शाखेच्या तुलनेत अव्वल ठरला आहे. विज्ञान शाखेतून ९ हजार ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.६६ इतकी आहे. त्या तुलनेत कला शाखेतून ११ हजार १७८ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ७६.९३ इतकी आहे. वाणिज्य शाखेतून १ हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ८६.२७ इतकी आहे. एमसीव्हीसी शाखेच्या निकालाची टक्केवारी ७९.३० इतकी आहे. यंदाच्या निकालातही मुलींचाच बोलबालाबारावीच्या निकालात यंदाही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. मुलींच्या निकालाची टक्केवारी ८६.०५ इतकी असून मुलांच्या निकालाची टक्केवारी ८१.२२ इतकी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २७ हजार ९११ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये १४ हजार ४४५ मुलांचा तर १३ हजार ४६६ मुलींचा समावेश होता. एकूण २७ हजार ८७६ विद्याथी परीक्षेला सामोरे गेले. यामध्ये १४ हजार ४२३ मुलांचा तर १३ हजार ४५३ मुलींचा समावेश होता. या परीक्षेत २३ हजार २९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ११ हजार ७१५ मुलांनी तर ११ हजार ५७६ मुलींनी बाजी मारली. कमी टक्केनिकाल देणाऱ्या शाळायावर्षीचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत पिछाडीवर गेला आहे. मागील वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांनी ९२ टक्के निकाला दिला होता. त्या तुलनेत यंदा ९ टक्क्यांनी निकाल घसरला आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही येथील नामदेवराव वडेट्टीवार ज्युनिअर कॉलेज या महाविद्यालयाने ३३.३३ टक्के निकाल दिला आहे. तर संत गजानन महाराज ज्युनिअर कॉलेज, पेंढरी मक्ता या शाळेने ३४.०९ टक्के निकाल दिला.