शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल @ ८३.५५

By admin | Updated: May 26, 2016 01:56 IST

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ‘आॅन लाईन’ घोषित करण्यात आला.

यंदाही मारली मुलींनीच बाजी : गतवर्षीच्या तुलनेत निकालात जिल्ह्याची घसरणचंद्रपूर : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ‘आॅन लाईन’ घोषित करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८३.५५ इतकी आहे. २७ हजार ९११ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी २७ हजार ८७६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यात २३ हजार २९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी बारावीचा ९२ टक्के निकाल लागला होता. त्यातुलनेत यंदा निकालात जिल्ह्याची घसरण झाल्याचे दिसून येते. चंद्रपूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८८.७५ टक्के लागला आहे. तर पोंभूर्णा तालुक्याचा निकाल सर्वात कमी ७०.६८ टक्के लागला. गतवर्षी ग्रामीण विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यांवर मात केली होती. यंदा तालुकानिहाय निकालाची टक्केवारी बघितल्यास शहरी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी निकालात सरशी घेतल्याचे दिसून येते. भद्रावती वगळता चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी वरोरा, राजुरा या शहरीभागातील विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण टक्केवारी ग्रामीण तालुक्यांच्या तुलनेत वाढविली आहे. विज्ञान शाखेतून ९ हजार ६५७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ९ हजार ६४८ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ९ हजार ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.६६ इतकी आहे. यामध्ये ४०८ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, २ हजार १५५ प्रथम, ५ हजार ९६९ द्वितीय, तर ५०४ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.कला शाखेतून १४ हजार ५४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १४ हजार ५३० विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ११ हजार १७८ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ७६.९३ इतकी आहे. यामध्ये २०२ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ३ हजार १२ प्रथम, ७ हजार १७३ द्वितीय तर ७९१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून एकूण २ हजार ७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसासाठी नोंदणी केली होती. पैकी २ हजार ७५ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात १ हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ८६.२७ इतकी आहे. यामध्ये ११८ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ५७६ प्रथम, ९३० द्वितीय तर १६६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसी शाखेतून एकूण १ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी १ हजार ६२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १ हजार २८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ७९.३० इतकी आहे. २२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यता, ५७० प्रथम, ६९३ द्वितीय तर २ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. (शहर प्रतिनिधी)निकालात विज्ञान शाखा अव्वलयावर्षीच्या बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा निकाल इतर शाखेच्या तुलनेत अव्वल ठरला आहे. विज्ञान शाखेतून ९ हजार ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.६६ इतकी आहे. त्या तुलनेत कला शाखेतून ११ हजार १७८ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ७६.९३ इतकी आहे. वाणिज्य शाखेतून १ हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ८६.२७ इतकी आहे. एमसीव्हीसी शाखेच्या निकालाची टक्केवारी ७९.३० इतकी आहे. यंदाच्या निकालातही मुलींचाच बोलबालाबारावीच्या निकालात यंदाही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. मुलींच्या निकालाची टक्केवारी ८६.०५ इतकी असून मुलांच्या निकालाची टक्केवारी ८१.२२ इतकी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २७ हजार ९११ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये १४ हजार ४४५ मुलांचा तर १३ हजार ४६६ मुलींचा समावेश होता. एकूण २७ हजार ८७६ विद्याथी परीक्षेला सामोरे गेले. यामध्ये १४ हजार ४२३ मुलांचा तर १३ हजार ४५३ मुलींचा समावेश होता. या परीक्षेत २३ हजार २९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ११ हजार ७१५ मुलांनी तर ११ हजार ५७६ मुलींनी बाजी मारली. कमी टक्केनिकाल देणाऱ्या शाळायावर्षीचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत पिछाडीवर गेला आहे. मागील वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांनी ९२ टक्के निकाला दिला होता. त्या तुलनेत यंदा ९ टक्क्यांनी निकाल घसरला आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही येथील नामदेवराव वडेट्टीवार ज्युनिअर कॉलेज या महाविद्यालयाने ३३.३३ टक्के निकाल दिला आहे. तर संत गजानन महाराज ज्युनिअर कॉलेज, पेंढरी मक्ता या शाळेने ३४.०९ टक्के निकाल दिला.