शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाही धोरण - नरेश पुगलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 11:48 IST

इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा सत्याग्रह

चंद्रपूर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविला. मात्र, त्यांचा आवाज बंद करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार करत आहे. देशाचे संविधान वाचविण्यासाठी व लोकशाही जिवंत राहावी म्हणून ते संघर्ष करीत आहेत. सामान्य जनतेचा विश्वासघात करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार करत आहे. एका प्रकारे ही केंद्र सरकारची दडपशाही आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.

चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्रातील मोदी सरकारने अन्यायकारी धोरण अवलंबिले आहे. त्यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार नरेश पुगलिया बोलत होते.

पुगलिया म्हणाले, राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेने सर्वसामान्य जनता जागृत झाली. केंद्रातील मोदी सरकार भयभीत झाले. अर्थसंकल्प अधिवेशनदरम्यान संसदेत मोदी-अदानी यांच्यावर प्रहार केला. ब्रिटनमधील भाषणाने देशाचा अपमान म्हणून संसदेचे कामकाज बंद केले. केवळ राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. तकलादू भाषणाचा विपर्यास करून त्यांना संसदेतून बेदखल केले आहे. जनतेचा पैसा कुठे जात आहे. ही विचारणा केल्यामुळे व केंद्र सरकारवर प्रहार केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नामोहरम करण्यासाठी केंद्र सरकारची प्रतिमा डागाळली आहे. याचे खापर सूडबुद्धीने विरोधी पक्षनेते यांच्यावर फोडत आहे, असा प्रहार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी केला.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गजानन गावंडे, युवा नेते राहुल पुगलिया, विजय मोगरे, अविनाश ठावरी, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ पाटील टोंगे, वसंत मांढरे, नासीर खान, रामदास वागद्रकर, चंद्रकांत पोडे, देवेंद्र बेले, माजी उपसभापती अनेकश्वर मेश्राम, लोकशाहीर बाबूराव जुमनाके, दिनकर पाटील डाहुले, अनिल तुंगीडवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNaresh Pugliaनरेश पुगलियाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा