शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दारू माफियांची क्रूरता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:03 IST

दारू माफियांनी मंगळवारी नागभीडच्या एका कर्तव्यदक्ष प्रभारी ठाणेदाराच्या अंगावर गाडी घालून बळी घेतला. या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. दारू विक्रेते अलिकडच्या काळात मुजोर झालेच होते; आता ते निर्दयी आणि क्रूरही होत असल्याचे या प्रकारावरून दिसून येते.

ठळक मुद्देसहायक पोलीस निरीक्षकाची हत्या : पोलीस प्रशासन हळहळले

घनश्याम नवघडे / रवी रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : दारू माफियांनी मंगळवारी नागभीडच्या एका कर्तव्यदक्ष प्रभारी ठाणेदाराच्या अंगावर गाडी घालून बळी घेतला. या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. दारू विक्रेते अलिकडच्या काळात मुजोर झालेच होते; आता ते निर्दयी आणि क्रूरही होत असल्याचे या प्रकारावरून दिसून येते. अवैध दारू विक्रेत्यांमुळे आता जिल्ह्यातील सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून अवैध दारू विक्रेत्यांना कायमस्वरुपी अद्दल घडविण्यासाठी कठोर कायदा व कारवाई श्रृंखला सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.भंडारा जिल्ह्यातील पवनीकडून तोरगावमार्गे मोठ्या प्रमाणावर दारूची अवैध वाहतूक होते. एका स्कार्पिओ गाडीने याच मार्गे मौशीकडून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती किसन चिडे यांना मिळताच ते तातडीने काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन मौशीला गेले. पण झाले उलटेच. ते स्वत:चाच जीव गमावून बसले.चंद्रपूर जिल्ह्यातील गावागावात, मोहल्या-मोहल्यात दारू मिळायला लागली आहे. या अवैध दारूविक्रीने गावातील वातावरण दूषित झाले आहे. बहुतेक गावातील तरूण या व्यवसायाकडे वळले आहेत. अगोदरच हाताला काम नाही. कमी वेळात दिवसभराची रोजीरोटी होते म्हणून त्यांनी या व्यवसायात उडी घेतली आहे. या दारूविक्रेत्यांची मुजोरी एवढी वाढली आहे की, त्यांच्याविरोधात कोणाची 'ब्र' काढायची हिंमत होत नाही. या प्रकाराने सामाजिक स्वास्थ्य पार बिघडून गेले आहे.अधिक नफा कमाविण्याच्या हव्यासापोटी बनावट दारूचे प्रमाण वाढल्याचेही दिसून येत आहे. याचा परिणाम आज जरी दिसत नसला तरी येणाºया आठ दहा वर्षात आज दारू पिणारी पिढी विविध आजारांनी ग्रासलेली दिसेल तेव्हा लक्षात येईल.अशाच एका दारू विक्रेत्याच्या मुसक्या आवळण्यासाठी नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे गेले होते. त्यांनी दारूविक्रेत्याच्या वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान, एका ठिकाणी वाहन थांबले असता ते आपल्या वाहनातून खाली उतरले. त्याचवेळी दारू विक्रेत्याने आपले वाहन रिव्हर्स करून त्यांना चिरडले. या घटनेबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे दारू विक्रेते पोलिसांचा जीव घेऊ शकण्यापर्यंत निष्ठूर झाल्याने प्रशासनाने गंभीर होऊन कारवाईचे सत्र सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.प्रतिकूल परिस्थितीवर केली मातछत्रपती चिडे हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून या सहायक निरीक्षक या पदापर्यंत आले. त्यांचे आई-वडील वणीजवळील मारेगाव येथे राहत असून ते दोघेही अंध आहेत. चिडे हे पूर्वी भद्रावती नगरपालिकेत नाली बांधकामात काम करायचे. पोलीस म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी जिद्द आणि चिकाटी ठेवून सतत अभ्यास करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली व पोलीस उपनिरीक्षक झाले.पोलीस ठाण्यात स्मशान शांतताएका कर्तव्यदक्ष ठाणेदाराचा अशाप्रकारे शेवट झाल्याने सर्वांचे मन सुन्न झाले. अनेकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. ठाणेदार छत्रपती चिडे यांच्या मृत्यूचीच सर्वत्र चर्चा होती. त्यामुळे दिवसभर पोलीस ठाण्यात स्मशान शांततेचे चित्र होते.भावाचाही दिवाळीतच झाला होता मृत्यूमृत छत्रपती चिडे यांचा लहान भाऊ गजानन चिडे याचाही मागील वर्षीच्या दिवाळीत विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता. यावर्षीच्या दिवाळीत छत्रपतींची हत्या झाली. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने अंध आई-वडील निराधार झाले आहेत. छत्रपती चिडे यांची मुलगी बीडीएस तर मुलगा दहावीत शिकत आहे. वडिलांचे छत्र हरविल्याने त्यांच्या शिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.