शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

‘त्या’ दोघांचाही मृतदेह आढळला; वैनगंगा नदीत नाव उलटल्याची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 18:27 IST

स्थानिक मच्छिमारांना त्या दोघांचा मृतदेह नदीघाटावरुन शंभर मीटर अंतरावर आढळून आला.

चंद्रपूर: वैनगंगा नदीपात्राच्या कढोली-हरांबा घाटावर अंत्यविधीसाठी जाताना नाव उलटल्याने दोघेजण बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्या दोघांचा पानबुड्याकडून शोध सुरु होता. बुधवारी दुपारच्या सुमारास स्थानिक मच्छिमारांना त्या दोघांचा मृतदेह नदीघाटावरुन शंभर मीटर अंतरावर आढळून आला. रामचंद्र हनुजी पेंदाम (४०), परशुराम वाघु आत्राम (४२) दोघेही रा. राजगोपालपुरी ता. चामोर्शी असे मृत युवकांचे नाव आहे. 

कढोली येथील एका महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्या महिलेवर कढोली-हरांबा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. अंत्यविधीसाठी गडचिरोली-चामोर्शी येथील आप्तेष्ठ नावेने येत होते. नदीघाट १०० मीटर अंतरावर असताना नाव अचानक डोहात उलटली. यावेळी नावेमध्ये बसलेले आठजण नदीत बुडाले.  पोलीस व नागरिकांच्या मदतीने अमलजित सुरेश कन्नाके (३०), देवराव मोहन कन्नाके (४०), केशव मोहन कन्नाके (४५), गंगाधर सोमू वेलादी (५३), संदीप देवराम कन्नाके (३५), कमला देवराव कन्नाके या सहा जणांना खोल डोहातून सुखरूप बाहेर काढले.

मात्र रामचंद्र हनुजी पेंदाम व परशुराम आत्राम यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी चंद्रपूर व गडचिरोली येथील पानबुड्यांची चमू बोलावली. या चमूच्या सहाय्याने रात्रीपर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र त्या दोघांचा पत्ता लागला नाही. बुधवारी पोलीस प्रशासनाने स्थानिक मच्छिमाराच्या सहाय्याने शोधमोहीम राबवली. दरम्यान दुपारच्या सुमारास नदीघाटापासून शंभर मीटर अंतरावर त्या दोघांचाही मृतदेह आढळून आला. यावेळी ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्यासह सावली पोलिसांची चमू उपस्थित होती. 

नावेमधून उडी घेतल्याने घडली घटना

त्या नावेला छोटे छिद्र होते. त्यामुळे नावेमध्ये पाणी जमा होत होते. काही अंतर पार केल्यानंतर नावेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. त्यामुळे दोघांनी नावेमधून उडी घेतली. परिणामी नावेचे संतुलन बिघडले. त्यामुळे नाव पलटी झाली.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र