शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

‘त्या’ दोघांचाही मृतदेह आढळला; वैनगंगा नदीत नाव उलटल्याची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 18:27 IST

स्थानिक मच्छिमारांना त्या दोघांचा मृतदेह नदीघाटावरुन शंभर मीटर अंतरावर आढळून आला.

चंद्रपूर: वैनगंगा नदीपात्राच्या कढोली-हरांबा घाटावर अंत्यविधीसाठी जाताना नाव उलटल्याने दोघेजण बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्या दोघांचा पानबुड्याकडून शोध सुरु होता. बुधवारी दुपारच्या सुमारास स्थानिक मच्छिमारांना त्या दोघांचा मृतदेह नदीघाटावरुन शंभर मीटर अंतरावर आढळून आला. रामचंद्र हनुजी पेंदाम (४०), परशुराम वाघु आत्राम (४२) दोघेही रा. राजगोपालपुरी ता. चामोर्शी असे मृत युवकांचे नाव आहे. 

कढोली येथील एका महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्या महिलेवर कढोली-हरांबा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. अंत्यविधीसाठी गडचिरोली-चामोर्शी येथील आप्तेष्ठ नावेने येत होते. नदीघाट १०० मीटर अंतरावर असताना नाव अचानक डोहात उलटली. यावेळी नावेमध्ये बसलेले आठजण नदीत बुडाले.  पोलीस व नागरिकांच्या मदतीने अमलजित सुरेश कन्नाके (३०), देवराव मोहन कन्नाके (४०), केशव मोहन कन्नाके (४५), गंगाधर सोमू वेलादी (५३), संदीप देवराम कन्नाके (३५), कमला देवराव कन्नाके या सहा जणांना खोल डोहातून सुखरूप बाहेर काढले.

मात्र रामचंद्र हनुजी पेंदाम व परशुराम आत्राम यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी चंद्रपूर व गडचिरोली येथील पानबुड्यांची चमू बोलावली. या चमूच्या सहाय्याने रात्रीपर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र त्या दोघांचा पत्ता लागला नाही. बुधवारी पोलीस प्रशासनाने स्थानिक मच्छिमाराच्या सहाय्याने शोधमोहीम राबवली. दरम्यान दुपारच्या सुमारास नदीघाटापासून शंभर मीटर अंतरावर त्या दोघांचाही मृतदेह आढळून आला. यावेळी ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्यासह सावली पोलिसांची चमू उपस्थित होती. 

नावेमधून उडी घेतल्याने घडली घटना

त्या नावेला छोटे छिद्र होते. त्यामुळे नावेमध्ये पाणी जमा होत होते. काही अंतर पार केल्यानंतर नावेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. त्यामुळे दोघांनी नावेमधून उडी घेतली. परिणामी नावेचे संतुलन बिघडले. त्यामुळे नाव पलटी झाली.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र