शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरी तालुक्यात सुगंधित तंबाखूचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:22 IST

किराणा व्यवसायिक गुंतले - लगतच्या तेलंगणा राज्यात पुरवठा गोंडपिपरी : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून ...

किराणा व्यवसायिक गुंतले - लगतच्या तेलंगणा राज्यात पुरवठा

गोंडपिपरी : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. याचाच गैरफायदा घेत गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक शहरातील व सीमावर्ती भागातील नागरिकांनी सुगंधित तंबाखूचा काळाबाजार करीत थेट तेलंगणा राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात पुरवठा करण्याचा गोरखधंदा चालविला आहे. किराणा व्यवसायाच्या आड सुरू असलेल्या या अवैध धंद्याकडे मात्र प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीवर पुलाची निर्मिती होताच सदर दोन्ही राज्य अंतर्गत वाहतुकीचा प्रश्न निकाली लागला. यामुळे तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागातील व्यावसायिकांची स्थानिक शहरातील व्यापाऱ्यांशी व्यापार संबंध प्रस्थापित झाले. तेलंगणा राज्यात सुगंधित व साध्या तंबाखूची मागणी अधिक प्रमाणात असल्याने याचाच गैरफायदा घेत गोंडपिपरी येथील काही किराणा व्यावसायिक तसेच सीमावर्ती भागातील काही नागरिकांनी थेट तेलंगणा राज्यात सुगंधित तंबाखू काळाबाजार करीत पुरवठा करणे सुरू केले. गतवर्षी व यंदाचे वर्षी राज्य शासनाने टाळेबंदी केली. याचा गैरफायदा घेत चढ्या भावाने सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा पुरवठा करून शहरातील व्यापाऱ्यांनी प्रचंड माया जमवल्याची माहिती हाती आली आहे. चक्क किराणा साहित्याच्या वाहनातून सदर तंबाखू पुरवठा करण्याचा गोरखधंदा चालविणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांवर आजवर अन्न औषध प्रशासन तथा पोलीस विभागाने थातुरमातुर कारवाई करून मोकळे झाले. संपूर्ण परिसरात अगदी राजरोसपणे पान टपरी धारक व इतर किरकोळ व्यावसायिक सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतात.

बॉक्स

पोळसा गाव बनले केंद्र

आजघडीला तालुक्यातील पोळसा हे तेलंगणा राज्यात सुगंधित तंबाखूचा पुरवठा करणारे केंद्र बनले असून थेट बल्लारपूर येथून गोंडपिपरी तालुक्यात मुबलक प्रमाणात सुगंधित तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या साठा दैनंदिन वाहतुकीने सुरळीत सुरू असल्याचीही विश्वसनीय माहिती आहे. यासंबंधी संबंधित विभागाने जातीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.