सभागृह, लॉनधारकांकडे कोट्यवधी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:00:55+5:30

बहुतांश मुलींचे वडील कर्ज काढूनच विवाह लावून देतात. लॉकडाऊनमूळे लग्नकार्य रद्द करावे लागले. सोशल डिस्टन्सिंग पाळून लग्न लावणाऱ्या कुटुंबांची संख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. मुलींच्या वडिलांनी सभागृह मालक लॉन मालकांना अंशत: किवा पूर्ण बुकींची रक्कम दिली. बºयाच कुटुंबांनी विवाह सोहळा पुढे ढकलले. मात्र, बुकींची रक्कम परत मिळाली नाही तर पुढे काय या प्रश्नाने अस्वस्थ झाले आहेत.

Billions stuck to halls, lawnholders | सभागृह, लॉनधारकांकडे कोट्यवधी अडकले

सभागृह, लॉनधारकांकडे कोट्यवधी अडकले

ठळक मुद्देकोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द : विवाह सोहळ्यासाठी पालकांनी केले होते बुकिंग

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नोव्हेंबर ते जून हा महिना लग्नाचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील हजारो पालकांनी आपल्या उपवर मुला-मुलींचे विवाह निश्चित केले. यासाठी सभागृह, कॅटरर व लॉन बुकींग केले. मात्र, जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू झाल्याने कौटुंंबीक व सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध घालण्यात आला. त्यामुळे मुला-मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी आगाऊ रक्कम देऊन बुकींग केलेले कोट्यवधी अडकले आहेत.
बहुतांश मुलींचे वडील कर्ज काढूनच विवाह लावून देतात. लॉकडाऊनमूळे लग्नकार्य रद्द करावे लागले. सोशल डिस्टन्सिंग पाळून लग्न लावणाऱ्या कुटुंबांची संख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. मुलींच्या वडिलांनी सभागृह मालक लॉन मालकांना अंशत: किवा पूर्ण बुकींची रक्कम दिली. बऱ्याच कुटुंबांनी विवाह सोहळा पुढे ढकलले. मात्र, बुकींची रक्कम परत मिळाली नाही तर पुढे काय या प्रश्नाने अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे कुणाचेही नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, सर्व नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मध्यस्थाची भूमिका पार पाडणे अत्यावश्यक झाले आहे.

काहींनी नकार दिल्याने आयुक्तांकडे निवेदन
कोरोनाचे संकट साऱ्या जगावरच आहे. यामध्ये कुणीही दोषी नाही. विवाह सोहळा पुढे ढकलेल्या काही कुटुंबांनी सभागृह व लॉनमालकांनी पैसे परत मागितले असताना नकार दिल्याने चंद्रपूर मनपाचे नगरसेवक सचिन भोयर यांच्या उपस्थितीत पालकांनी मनपा आयुक्तांना दिले.
२ हजार ६९९ जणांचे क्वारंटाईन पूर्ण
ब्रह्मपरी : रोजगार, शिक्षण व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने परजिल्ह्यात गेलेले तालुक्यातील ३ हजार ३३७ व्यक्ती परजिल्ह्यातून दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार ६९९ जणांचा क्वारंटाईन काळ पूर्ण झाला. सध्या ६३८ व्यक्ती अजूनही क्वारंटाईनमध्ये आहेत. ब्रह्मपुरी शहरातील ३४५ व्यक्ती होम क्वारंटाईन पूर्ण झाले तर ११५ होम क्वारंटाईन आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये. तालुक्यातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी निश्चित केलेल्या वेळेतच बाजारात जावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Billions stuck to halls, lawnholders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.