शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

सुरक्षेवर कोट्यवधी खर्च; धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 11:33 PM

वेकोलिने प्रकल्पग्रस्त आणि खाणीतील कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व कामगारांमध्येही असंतोष आहे.

ठळक मुद्देवेकोलिच्या सर्व खाणींमधून केवळ उत्पादनावरच भरसुरक्षात्मक उपाययोजनांकडे कानाडोळा; हजारो कामगारांचा जीव धोक्यात

राजेश रेवते।आॅनलाईन लोकमतमाजरी : वेकोलिने प्रकल्पग्रस्त आणि खाणीतील कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व कामगारांमध्येही असंतोष आहे. माजरी क्षेत्रातील काही खाणी बंद झाल्यामुळे कामगारांचे स्थानांतरण करण्यात आले. सुरक्षा व कामगार कायद्यानुसार मागण्यांचा आग्रह धरल्यास कामावरून काढण्याची भीती आहे. त्यामुळे सुमारे दोन हजार कामगार मानसिक दबावात आहेत. आजही हा प्रकार बंद झाला नाही. सुरक्षेसाठी वेकोलिकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जाते. मात्र, अपघातांचा धोका कायम असल्याने ही रक्कम नेमकी जाते कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.माजरी येथील जुना कुनाडा खाणीत धनसार इंजिनिअरिंग कंपनीने उत्खनन सुरू केले. या कंपनीकडे ६०० कामगार काम करतात. सुरक्षेच्या कारणावरून खाण बंद केल्यास कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून कोळसा खाण सुरू ठेवल्यास कामगारांचे हित आहे. पण वेकोलि प्रशासनाने केवळ उत्पादनावर डोळा ठेवून सुरक्षा यंत्रणेत सुधारणा केली नाही. त्याचा फटका कामगारांना बसु लागला आहे. तेलवासा खुल्या खाणीत ढिगारा कोसळल्याने कामगाराचा मृत्यू झाला. जुना कुनाडा खाणीत सहा कामगार जखमी झाले. या घटनेत सुरक्षितेतील त्रुटी पुढे आल्या पण, त्या दुरूस्ती करण्यासंदर्भात पाऊले उचलण्याची शक्यता कमीच दिसते. कोळसा खाणीत शंभर टक्के दुरूस्त वाहनांचा वापर केला जात नाही. यातूनही अनेक अपघात होत आहेत. मातीचे ढिगारे उपसल्यानंतर ते किती उंचीवर ठेवावे याचेही नियम आहेत. मात्र, अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे परिसरातील शेतीमालाची उत्पादकता घटण्याची उदाहरणे पुढे येत आहे. माजरी, शिवाजीनगर, पाटाळा, नागलोन, पळसगाव येथील काही शेतकºयांच्या जमिनी हस्तांतरीत केल्या. नियमानुसार मोबदला आणि काहींना नोकºया देवू असे आश्वासन वेकोलिने दिले होते. दरम्यान, आंदोलनाची भूमिका घेतल्याने काहींना नोकºया मिळाल्या. परंतु अनेकजण वंचित असल्याचे दिसून येते. वेकोलि माजरी क्षेत्रात पाच कामगार संघटना कार्यरत आहेत. कामगारांच्या हितासाठी वेकलि व्यवस्थापनाविरूद्ध संघर्षाची भूमिका घेणे गरजेचे आहे. अंतर्गत सुधारणा करण्यासाठी व्यवस्थापनावर दबाव राहिल्यास परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे हक्क तुडविण्याची हिंमत वेकोलिचे संबंधित अधिकारी करणार नाहीत.