लाभार्थ्यांना गहू, तांदूळ मिळणार मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST2021-08-18T04:34:12+5:302021-08-18T04:34:12+5:30
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना गहू प्रति व्यक्ती ३ किलो २ रुपये प्रति किलो ...

लाभार्थ्यांना गहू, तांदूळ मिळणार मोफत
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना गहू प्रति व्यक्ती ३ किलो २ रुपये प्रति किलो दराने तर तांदूळ प्रति व्यक्ती २ किलो ३ रुपये प्रति किलो दरानुसार देण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गहू प्रति शिधापत्रिका १५ किलो, दोन रुपये प्रति किलो दराने व तांदूळ प्रति शिधापत्रिका २० किलो तीन रुपये प्रति किलो दरानुसार देय राहणार आहे. साखर २० रुपये प्रति किलो दराने १ किलो याप्रमाणे देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिका धारकांना गहू व तांदूळ मोफत असून दोन्ही योजनेतील शिधापत्रिका धारकांना गहू प्रति व्यक्ती ३ किलो तर तांदूळ प्रति व्यक्ती २ किलो परिमाणाने देण्यात येणार असल्याचे चंद्रपूरच्या तहसीलदारांनी कळविले आहे.