शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

बंडू धोत्रे यांचा अन्नत्याग सत्याग्रह मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST

चंद्रपूर : शहरातील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह प्रशासनाने मागण्या मान्य ...

चंद्रपूर : शहरातील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह प्रशासनाने मागण्या मान्य केल्यानंतर मागे घेण्यात आला. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र तहसीलदार नीलेश गौंड यांच्या हस्ते देण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांच्या हस्ते लिंबूपाणी पाजून बंडू धोत्रे यांचे उपोषण सोडले.

चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्याकरिता पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास येत्या सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिलेत. रामाळा तलाव स्वच्छता व सुशोभीकरणासाठी दोन टप्प्यांत कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या निर्देशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपरोक्त विषयाबाबत सर्व संबंधित यंत्रणेची आढावा सभा घेण्यात आली. रामाळा तलाव खोलीकरणबाबतचा प्रस्ताव पाटबंधारे विभागामार्फत तयार करण्यात आला असून, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांना सादर करण्यात आला आहे.

खोलीकरणाबाबत पुरातत्त्व विभागाची परवानगी आवश्यक असल्याने, विहीत नमुन्यात परवानगीसाठी प्रस्ताव तयार करून भारतीय पुरातत्त्व विभागाला सादर करण्यात येत असल्याबाबत व यासंबंधाने वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून सदर प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती करण्यात आली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

कोट

रामाळा तलावाचा प्रश्न घेऊन इकोप्रोने हाक दिली आणि सर्वसामान्य जनतेनी साथ दिली. हा लढा केवळ इको-प्रोचा नव्हता, तर तो जनतेचा होता. १२व्या दिवशी प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने अन्नत्याग सत्याग्रह मागे घेत आहे. आता तलाव संवर्धनासाठी खऱ्या अर्थाने सत्याग्रह सुरू होणार आहे, त्याला चंद्रपूरकर नागरिकांची अशीच साथ हवी आहे.

- बंडू धोतरे, अध्यक्ष, इको प्रो