शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Ballarpur Railway Bridge Accident : रेल्वे प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल; २ अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2022 10:54 IST

स्ट्रक्चरल ऑडिट योग्य प्रकारे न केल्याचा ठपका

चंद्रपूर : बल्लारपूररेल्वेस्थानकावर रविवारी झालेल्या रेल्वे ब्रीज दुर्घटनेप्रकरणी बल्लारपूर जीआरपी पोलिसांनी मंगळवारी रेल्वे प्रशासनाविरोधात भादंवि ३०४ (अ) ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला. रेल्वे विभागाने इन्स्पेक्टर ऑफ वर्क जी. जी. राजूरकर व याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव यांना निलंबित केले आहे. ही कारवाई मुंबई रेल्वे मंडळ प्रबंधकांनी केली असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

सात महिन्यांपूर्वी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. मात्र, ते योग्य पद्धतीने केले गेले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणात दोन अधिकारी दोषी दिसून आल्याने त्यांच्यावर रेल्वे विभागाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ब्रीज ओके असा संदेश देणारे अधिकारी व संबंधितांवरही निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत आहेत. बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाला भगदाड पडल्याने रविवारी एका महिला प्रवाशाचा मृत्यू, तर १७ जण जखमी झाले हाेते. या घटनेने मध्य रेल्वे प्रशासन खळबळून जागे झाले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे या दोन दिवसांपासून रेल्वे स्थानकावर तळ ठोकून आहेत.

'त्या' अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत...

रेल्वे स्थानकावरील क्रमांक एक प्लॅटफार्मवरून दोन आणि तीन क्रमांकाच्या प्लॅटफार्मकडे जाण्यासाठी १९७२ मध्ये ओव्हरब्रीज बनविण्यात आला. त्यानंतर रेल्वेगाड्या वाढताच प्लॅटफार्मचा विस्तार झाला. या लोखंडी रेल्वे पुलाचे ३१ वर्षांनंतर २००३ मध्ये पुनर्निरीक्षण करण्यात आले. या पुलावरून २५ प्रवासी जाऊ शकतात, एवढीच क्षमता आहे; परंतु प्रशासनाने प्रवाशांच्या संख्येकडे लक्ष दिले नाही. तेव्हापासून हा पूल दुर्लक्षित होता.

विशेष म्हणजे, सहा महिन्यांआधी १४ मे २०२२ रोजी मध्य रेल्वेचे मुंबई येथून महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांनी विशेष रेल्वे गाडीने रेल्वे प्रशासनाचा ताफा घेऊन बल्लारपूर रेल्वेस्थानकाच्या निरीक्षणासाठी आले. तेव्हा येथील आयओडब्ल्यू रेल्वे विभागाचे विभागीय अभियंत्यांनी पुलाची रंगरंगोटी करून हा ब्रीज ओके असल्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाला दिला. त्यामुळे बल्लारपूर रेल्वे विभागातील दोन अभियंता व दोन एरिया ऑफिसरवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.

दरम्यान, मंगळवारपासून वस्तीकडे जाणारा रेल्वे पूल व स्टेशनच्या आतील रेल्वे पुलावर बल्लारपूर रेल्वे (आरपीएफ) सुरक्षा दलाचे शिपाई रेल्वे प्रवाशांवर नियंत्रण ठेवत आहेत. प्लॅटफार्म क्रमांक एकवरून पाचपर्यंत गेलेल्या लोखंडी पुलाच्या डागडुजी करण्याचे काम दिवसभर सुरू होते.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेsuspensionनिलंबनballarpur-acबल्लारपूर