बल्लारपुरात दररोज २२ टक्के गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:54+5:30

काम पूर्ण झाल्यावर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध होण्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी सुशिल पाटील यांनी दिली आहे. दोन वर्षे आधी शहरात ६ कोटी खर्चून ३३ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु शहराचा वाढत विस्तार पाहता राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे बल्लारपूर शहरातील जनतला २४ तास पाणी मिळण्यासाठी ६५ कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.

Ballarpur: 22% leakage per day | बल्लारपुरात दररोज २२ टक्के गळती

बल्लारपुरात दररोज २२ टक्के गळती

ठळक मुद्देजलवाहिन्या बदलविण्याचे काम सुरू। ४५ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

मंगल जीवने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : शहरातील जलवाहिन्या जुन्या झाल्यामुळे दोन वर्षांपासून बदलविण्याचे काम सुरू आहे. मात्र, सद्यस्थितीत दररोज सुमारे २२ टक्के जल गळती होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्या अंतर्गत शहरातील ३२ वॉर्डात टाकण्यात आलेले पाईप लाईनचे काम ५० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त झाले.
काम पूर्ण झाल्यावर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध होण्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी सुशिल पाटील यांनी दिली आहे. दोन वर्षे आधी शहरात ६ कोटी खर्चून ३३ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु शहराचा वाढत विस्तार पाहता राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे बल्लारपूर शहरातील जनतला २४ तास पाणी मिळण्यासाठी ६५ कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. शहराची लोकसंख्या ८९ हजार ४५२ च्या घरात आहे.
त्यानुसार प्राधिकरणाकडे नळधारक ग्राहकांची अधिकृत संख्या ९ हजार १६३ तर अनाधिकृत ग्राहकांची संख्या ८७ आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहराला दररोज पाणी पुरविण्यात येत आहे.

नळग्राहक जागृत नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे २२ टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याची गळती आहे. नळाच्या तोट्या काढणे, मीटर काढणे, अवैध जोडणीला आळा घालणे सुरू असले तरी पाणी पुरवठा नळयोजना ६० लाखांच्या वर तोट्यात आहे.
- एस.बी.येरणे, शाखा अभियंता, मजीप्रा बल्लारपूर

पाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉल्व तसेच तुटलेल्या पाइपमधून पाण्याची गळती अधिक आहे. याचा भुर्दंड प्रामाणिक नळधारककांना बसत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यावर नियंत्रण आणले तर शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळू शकते
- संजय डुंबेरे, सामाजिक कार्यकर्ता

वर्धा नदीला मुबलक पाणी असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाई होत नाही जनतेच्या सहभागामुळे सर्वांना पाणी मिळते. नगर परिषदेने लावलेले २३० सार्वजनिक नळ बंद केल्या जात आहेत. आतापर्यंत ९२ नळ बंद केले आहे. जीवन प्राधिकरणच्या एक लिटरची पाण्याची बॉटल ग्राहकांना केवळ १८ पैशाला पडते.
- सुशील पाटील,
उपविभागीय अभियंता

Web Title: Ballarpur: 22% leakage per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी