शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

जिल्ह्यातील नियमित कर्जदार अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 5:00 AM

नियमित कर्जदारांना देखील कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याने आशेवर झुलवत ठेवले आहे.  आहे. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे.  वेळप्रसंगी सावकारांचे कर्ज काढून काही शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय मिळतो मग प्रामाणिक असणाऱ्या नियमित कर्जदारांना का लाभ  का नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित कर्जदार व्यक्त करीत आहेत. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे शासन निर्णयाकडे डोळे, रब्बी हंगामाला पैसे नाही

  लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर :  महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना सुरू होऊन सहा महिने झाले. मात्र या कर्जमाफीची पूर्ण प्रक्रिया पार पडलेली नाही. या कर्जमाफीत थकबाकीदारांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, नियमित कर्ज भरणारे सभासद कर्जमाफीच्या आशेवर झुलत आहेत.  शासनाने नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनपर कर्जमाफी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.  नियमित कर्जदारांना देखील कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याने आशेवर झुलवत ठेवले आहे.  आहे. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे.  वेळप्रसंगी सावकारांचे कर्ज काढून काही शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय मिळतो मग प्रामाणिक असणाऱ्या नियमित कर्जदारांना का लाभ  का नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित कर्जदार व्यक्त करीत आहेत. कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची देखील परिस्थिती फार चांगली  नाही. परंतु या शेतकऱ्यांची मानसिकता सकारात्मक असल्याने कोणतेही अडचण आली तरी त्यांनी आपल्या कर्जाचा भरणा वेळेत केला आहे. तसेच डॉ.पंजाबराव देशमुख पीक प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली आहे. परंतु शासनाने नियमित कर्जदारांसाठीची घोषणा अंमलात आणली नाही तर नियमित कर्जदारांची ही संख्या भविष्यात घटणार आहे. वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २००८ च्या कर्जमाफीत २० हजार अथवा कर्जाच्या २५ टक्के प्रमाणात कर्जमाफी मिळाली होती. याखेपेस मात्र योजनेची घोषणा होऊनही सरकारने शेतकऱ्यांना लाभ दिलेला नाही, अशा तक्रारी आहेत.

शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली. यामध्येही जे शेतकरी नियमित बँकेचे,सहकारी संस्थाचे कर्ज नियमित भरले त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र दिवाळी येऊनही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही. या हंगामात सोयाबीन, धान व कापुस उत्पादन रोगामुळे कमी येत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्यास भर पडणार आहे.- प्रशांत कोल्हे, प्रगत शेतकरी,  वाहांनगाव,ता चिमूर

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी