शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आर्यन कोल वॉशरीजच्या कामगारांना कामावर घेण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST

कंपनीचे काम सुरू झाल्यानंतर कामगारांना कामावर घेण्याचे लेखी पत्र कामगार आयुक्त चंद्रपूर यांनी कंपनीला दिले होते; परंतु कोल वॉशरीजचे ...

कंपनीचे काम सुरू झाल्यानंतर कामगारांना कामावर घेण्याचे लेखी पत्र कामगार आयुक्त चंद्रपूर यांनी कंपनीला दिले होते; परंतु कोल वॉशरीजचे काम सुरू झाल्यानंतरही कामगारांना कामावर घेण्यास आर्यन कोल वॉशरीज व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. याबाबत कामगारांनी चंद्रपूर येथील कामगार आयुक्तांकडे निवेदनातून जुन्याच कामगारांना कामावर घेण्याची विनंती केली आहे.

राजुरा तालुक्यातील पांढरपौनी आर्यन कोल वॉशरीज कंपनी २०१८ मध्ये काही कारणामुळे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे कामगारांना कामावरून काढण्यात आले होते. जेव्हा कंपनी पुन्हा सुरू होईल, तेव्हा परत जुन्याच कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन कामगारांना दिले होते; परंतु कंपनी सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी कामगारांना कामावर घेण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कामगारांतून कंपनीविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. आर्यन कोल वॉशरीज सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. काही जुन्या कामगारांना कंपनीने कामावर घेतल्यानंतर पुन्हा सात कामगारांना कामावर घेण्यास आर्यन कोल वॉशरीज व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. काम उपलब्ध झाल्यानंतर जुन्याच कामगारांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरही कंपनी कामगारांना कामावर घ्यायला तयार नाही. १८ वर्षे कंपनीत काम केल्यानंतरही कंपनीने कामगारांना कामावर रुजू करून घेण्यास नकार दिल्याने कामगारांवर अन्याय होत आहे, असा आरोप वासुदेव लोणारे, अनिल भगत, खुशब पिदूरकर, भगवान व्याहाडकर, विनोद मडचापे, अजय जेनेकर व इतर कामगारांनी केला आहे. कंपनीने कामावर न घेतल्यास कंपनीसमोर आंदोलन करण्याचा इशाराही कामगारांनी दिला आहे. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने आर्यन कोल वॉशरीजचे व्यवस्थापक वर्मा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.