शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

विवाह स्वागत सोहळ्यात चक्क नवरदेवानेच केली हत्या; नऊ जणांना कारावासाची शिक्षा

By परिमल डोहणे | Updated: April 7, 2023 18:03 IST

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : आरोपींत दोन मृतांचा समावेश

चंद्रपूर : लग्नानंतर धूमधडाक्यात स्वागत समारंभ सुरू असतानाच चक्क नवरदेवानेच वाद उकरून काढत एका दाम्पत्याशी भांडण सुरू केले. नवरदेवाला राग इतका अनावर झाला की त्याने आपल्या सहकाऱ्यांसह त्या दाम्पत्याला काठी, कुऱ्हाड व जांबिया तलवारीने बेदम मारहाण केली. यात पती संतोषसिंह टाक यांचा मृत्यू झाला. तर पत्नी रिनाकौर संतोषसिंह टाक या जखमी झाल्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने न्यायालयीन लढाई लढली अन् ती जिंकलीही. चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ गिरीश जी. भालचंद्र यांनी हत्येच्या गुन्ह्यातील नऊही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व ८ हजार ५०० रुपयांचा दंड व सहकलम अंतर्गत १ ते ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

करणसिंग टाक (२२), आचीसिंग सबजितसिंग टाक (३६), सगतसिंग देवीसिंग बावरी (३२), भीमसिंग सबजितसिंग टाक (२६), विक्रमसिंग पापासिंग सबजितसिंग टाक, बलदेवसिंग सबजितसिंग टाक (४०), सबजितसिंग टाक (सर्व रा. चंद्रपूर) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर कविताकौर बावरी व सतकौर सबजितसिंग टाक या दोघांचा मृत्यू झाला आहे.

बाबूपेठ येथील जुनोना चौक विक्तूबाबा मंदिराजवळ ११ जून २०१८ रोजी आरोपी करणसिंग टाक याच्या विवाहाचा स्वागत समारंभ सुरू होता. या स्वागत समारंभात आरोपी करणसिंग टाक याने सहकाऱ्यांच्या मदतीने जुन्या वादातून भांडण करत संतोषसिंह टाक व त्याची पत्नी रिनाकौर संतोषसिंह टाक या दाम्पत्याला जांबिया तलवार व कुऱ्हाड, काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत संताेषसिंह टाक यांचा मृत्यू झाला, तर पत्नी रिनाकौर गंभीर जखमी झाल्या होत्या.

याप्रकरणी रिनकौर यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध कलम ३०२, ३०७, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ३४१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तक्रारीच्या आधारावर पोलिस उपनिरीक्षक व्ही. बी. मोरे यांनी तपास करत सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ गिरीश जी. भालचंद्र यांनी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा, ८ हजार ५०० रुपयांचा दंड व सहकलम अंतर्गत १ ते ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी वकील म्हणून ॲड. संदीप नागापुरे यांनी काम पाहिले.

निकाल लागण्यापूर्वीच दोन आरोपींचा मृत्यू

११ जून २०१८ रोजी संतोषसिंग टाक यांची नऊ जणांनी हत्या केली होती. याबाबत सुमारे पाच वर्षे न्यायालयात खटला चालला. शेवटी बुधवारी जिल्हा सत्र न्यायधीशांनी निकाल देत नऊ जणांना आजन्म कारावास ठोठावला. परंतु, नऊ आरोपींपैकी सतकौर सबजितसिंग टाक व कविताकौर बावरी या दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नchandrapur-acचंद्रपूर