शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे तब्बल २०० एकर जमीन पडीक; जागेचा सदुपयोय केव्हा? बेरोजगारांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 13:39 IST

Chandrapur : सदुपयोग व्हावा इंग्रजांनी आरक्षित करून ठेवली होती जमीन

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड: नागभीड येथे रेल्वेच्या मालकीची २०० एकर जमीन आहे. ही जमीन वापराविना अशीच पडून आहे. या जागेचा सदुपयोग केव्हा होईल असा येथील बेरोजगारांचा प्रश्न आहे. 

नागभीड येथून १९०८ साली रेल्वेची सुरुवात झाली. काही दिवसांतच जंक्शनही निर्माण झाले. नागभीडचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन इंग्रजांनी रेल्वे स्थानकाच्या सभोवताली २०० एकर जमीन खरेदी केली. बिलासपूर झोनमध्ये नैनपूरनंतर नागभीड येथेच रेल्वेकडे एवढी जमीन असल्याची माहिती आहे. 

इंग्रजांनी नागभीड येथे २०० एकरच्या जवळपास जमीन राखीव करून ठेवली, याच्या मागे त्यांचा काही तरी उद्देश नक्कीच असेल. रेल्वेसंबंधी एखादा कारखाना नागभीड येथे सुरू करण्याचा त्यांचा मानस निश्चित असावा. कारण नागभीड येथे तिन्ही मार्गाना रेल्वेचे जाळे असल्याने नागभीड येथून चंद्रपूर, बल्लारपूर मार्गे दक्षिणेकडे, नागपूरमार्गे उत्तरेकडे, गोंदियामार्गे पूर्वेकडे उत्पादित मालाची वाहतूक सहज शक्य होती. मात्र, इंग्रज जाऊन आता ७५ वर्षाच्या वर कालावधी लोटत आहे, पण या जागेचा कोणताच उपयोग होताना दिसत नाही. म्हणूनच या भागात आजही विनोदाने म्हटले जाते की, इंग्रज आणखी १० ते २० वर्षे या देशात राहायला पाहिजे होते, त्यांनी या जागेवर एखादा प्रकल्प निश्चितच उभारला असता आणि या भागातील बेरोजगारांना निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. 

सदनिका उभारणार? 

  • इंग्रज गेले, पण इंग्रजांनी या ठिकाणी एवढी जमीन का आणि कशासाठी खरेदी करून ठेवली, याचा अभ्यास करण्यासाठी कोणीही तसदी घेतली नाही. या रेल्वे गाडीचा थांबा द्या, त्या रेल्वे गाडीचा थांबा द्या या मागणी पलीकडे कुणीही जात नाही हेच या भागाचे मोठे दुर्दैव आहे. आता तर रेल्वेच्या या जागेवर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सदनिका उभ्या करण्याचे काम रेल्वे विभागाने सुरू केले आहे. 
  • भविष्यात नागपूर येथे कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी नागभीड येथे सदनिका उभारण्याचे नियोजन असल्याची चर्चा रेल्वे वर्तुळात आहे.

"जागेची उपलब्धता लक्षात घेऊन येथे रेल्वेसंबंधी विविध प्रकल्पांना वाव आहे. पूर्वी येथे इंजिन दुरुस्ती केंद्र होते. ते बंद करण्यात आले. हे केंद्र पुन्हा सुरू करावे, रेल्वे डब्यांचा कारखाना होऊ शकतो. अशा अनेक प्रकल्पांना वाव आहे. ज्यातून बेरोजगारांना काम मिळेल." - गुलजार धम्माणी, अध्यक्ष व्यापारी संघ नागभीड

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरrailwayरेल्वे