शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात अस्वलाचे आगमन; नागरिकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:02 PM

जंगलातून भरकटलेले एक अस्वल गुरुवारी पहाटेच्या सुमारास बल्लारपुरातील भरवस्तीत शिरले.

ठळक मुद्देबेशुध्द करून केले जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जंगलातून भरकटलेले एक अस्वल गुरुवारी पहाटेच्या सुमारास बल्लारपुरातील भरवस्तीत शिरले. वस्तीत अचानक अस्वल पाहून नागरिकांची एकच तारांबळ उडाली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. बऱ्याच प्रयत्नानंतर वनकर्मचाऱ्यांनी अस्वलीला बेशुध्द करून जेरबंद केले.पहाटे ४ वाजताच्या सुमारास सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना हे अस्वल, वस्ती विभागात गांधी पुतळा परिसरात दिसले. त्यामुळे प्रारंभी नागरिकांची एकच तारांबळ उडाली. त्यानंतर बघ्यांची गर्दी झाली. गर्दी बघून अस्वल घाबरले आणि मार्ग मिळेल त्या दिशेने ते पळत सुटले. या दरम्यान ही माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यांनी तिला पकडण्याचा बराच प्रयत्न केला. ती हातात न लागता पळत येथील वनकार्यालयाकडे गेली व तेथील कॉलनीतील पडक्या शौचालयात जावून बसली. वनकर्मचाऱ्यांनी तिला गुंगीचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले. आजपर्यंत जंगली प्राण्यांचा शिरकाव शहराच्या वेशीपर्यंतच झाडी झुडपांच्या विरळ वस्ती असलेल्या भागातच व्हायचा. आता तर ते चक्क भरवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी दिसू लागले आहे. या प्रकाराने नागरिकांना भीती व चिंता वाटू लागली आहे. सदर अस्वल बरेच मोठे होते. ती नांदगाव - विसापूरकडून रेल्वे गोलपुलाकडून शहरात झाला असावा, असे बोलले जात आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव