शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाणीपुरवठ्याची प्रलंबित कामे मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 05:00 IST

खासदार धानोरकर म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यावरील एकूण २० पुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. ते काम कुठे अडले याबाबत विभागांनी माहिती घ्यावी. पुलाच्या बांधकामाचे प्रस्ताव १५ दिवसांच्या आत तयार करून मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. प्रपत्र ‘ड’ यादीत काही घरकूल लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन मध्ये सुटली आहेत, अशांची माहिती घेत दखल घ्यावी. ज्या गावातील नागरिकांना अजूनही घरकूल मिळाले नाही त्या गावांचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशा सूचना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या योजना महत्त्वाच्या असून कोरोना काळात काही कामे प्रलंबित होती. मात्र, कोरोना कमी झाल्याने ही प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा, असे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी  दिले. नियोजन भवनात बुधवारी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, खासदार अशोक नेते, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, श्याम वाखर्डे, प्रकल्प अधिकारी  बक्षी आदी उपस्थित होते.खासदार धानोरकर म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यावरील एकूण २० पुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. ते काम कुठे अडले याबाबत विभागांनी माहिती घ्यावी. पुलाच्या बांधकामाचे प्रस्ताव १५ दिवसांच्या आत तयार करून मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. प्रपत्र ‘ड’ यादीत काही घरकूल लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन मध्ये सुटली आहेत, अशांची माहिती घेत दखल घ्यावी. ज्या गावातील नागरिकांना अजूनही घरकूल मिळाले नाही त्या गावांचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशा सूचना केल्या. प्रकल्प संचालक वर्षा गौरकर यांनी सादरीकरण केले. यावेळी भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, गोंडपिपरी पं. स. सभापती सुनीता येग्गेवार, जिवती पं.स. सभापती अंजना पवार, राजूरा पं. स. सभापती मुमताज अब्दुल, सावली पं.स. सभापती विजय कोरेवार, सिंदेवाही पं.स. सभापती मंदा बाळबुधे, नागभीड पं.स. सभापती प्रफुल्ल खापर्डे, जि. प. सदस्य सुनीता धोटे, पवन भगत, कुंदा जेनेकर, कुचनाच्या सरपंच वर्षा ठाकरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

चार गावांचा पाणीपुरवठा बंदजलजीवन मिशन अंतर्गत वरोरा तालुक्यातील शेंबळ, राळेगाव, फत्तापूर व बोडखा या चार गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. तो कार्यान्वित करावा. शालेय पोषण आहार योजना संदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून धान्याचा पुरवठा होतो. त्याचा दर्जा व साठवणूक आदींसाठी धान्याच्या गोडाऊनची पाहणी करावी. आठवड्यातून एकदा शाळांना भेटी द्याव्यात, अशा सूचनाही खासदार धानोरकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना  केल्या.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीWaterपाणी