शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

आर्च, पायलट बंधाऱ्यांमुळे सिंचनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:00 AM

तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सिंचनाची समस्या आ वासून उभी आहे, या परिसरात आसोलामेंढा, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प कार्यरत आहे. मात्र यातील पाणी काही विशिष्ट गावापर्यतच पोहचते. चौफर पाणी पोहचु शकत नाही. यामुळे नेहमीच शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक वाया जात असते. परंतु माजी पालकमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अनेक नवनविन योजना कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मोठा दिलासा: तालुक्यात बंधारे बांधण्याला प्राधान्य

भोजराज गोवर्धन।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : सिंचनाच्या अपुऱ्यां सोयीमुळे शेतकऱ्यांचे पीक वाया जावू नये, यासाठी तालुक्यातील मारोडा येथील आर्च व चिरोली येथील पायलट बंधारा नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे. या आर्च व पायलट बंधाऱ्यांमुळे परिसरातील सिंचनात वाढ झाली आहे.तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सिंचनाची समस्या आ वासून उभी आहे, या परिसरात आसोलामेंढा, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प कार्यरत आहे. मात्र यातील पाणी काही विशिष्ट गावापर्यतच पोहचते. चौफर पाणी पोहचु शकत नाही. यामुळे नेहमीच शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक वाया जात असते. परंतु माजी पालकमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अनेक नवनविन योजना कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तालुक्यातील मारोडा येथील आर्च बंधारा केवळ आठ लाख रूपयांत पूर्ण करण्यात येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले आणि सहायक अभियंता रूपेश बोदले यांना यश आले आहे. या बंधाऱ्यात पाणीसाठाही मोठया प्रमाणावर आहे, पाणीसाठयात वाढ होण्याच्या दृष्टीने आर्च बंधारे नागपूर आणि अमरावती विभागात मोठया प्रमाणावर बांधण्याचे निर्देश बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर येथे पार पडलेल्या बांधकाम विभागाच्या अभियंता बैठकीत दिले.तालुक्यातील आर्च बंधाऱ्यासोबतच जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील पायलट बंधाराही नागरिकांचे आकर्षण बनले आहे. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १८३.३१ लक्ष निधी उपलब्ध करून दिला. यामुळे सदर बंधाऱ्यांचे काम पुर्ण करण्यात आले आहे.तालुक्यातील चिरोलीजवळील अंधारी नदीवर सुमारे ९० मीटर लांबीचा पूल २०१५-१६ या वित्तीय वर्षात बांधण्यात आले होते. सदर पूलाच्या बाजुला बांधलेल्या बंधाऱ्याला २.८३ मीटर लांब व ३.५० मीटर उंचीचे २३ दरवाजे लावण्यात आले आहे. या ठिकाणी ३.९३ लक्ष घनमीटर पाणी साठा राहू शकतो. केवळ सहा महिन्यात बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यात सुमारे साडेपाच किमीपर्यंत पाण्याचा साठा आहे.सदर बंधाऱ्याला वेगवेगळया राज्यातील बांधकाम विभागाचे अधिकारी भेट देत आहेत. येत्या काही महिन्यात तालुक्यातील चिचाळा, बोरचांदली, नलेश्वर चिमढा येथील बंधाऱ्यांचे काम पुर्णत्वाा जाण्याची शक्यता आहे.मुनगंटीवारांकडून अधिकाऱ्यांची स्तुतीसिंचनाची समस्या कायस्वरूपी दुर व्हावी, यासाठी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भास्करवार, उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले, सहा. अभियंता रूपेश बोदले यांचे सहकार्य लाभत आहे. तालुक्यातील मारोडा येथील १५ मीटर लांबीच्या आर्च बंधाऱ्याला माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची स्तुती केली. तालुक्यात यासारखे बंधारे मोठया प्रमाणावर बांधून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावे,असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी