शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

नागभीडबाबत शासनाची परस्परविरोधी भूमिका

By admin | Updated: June 28, 2015 01:40 IST

नागभीड येथे नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

घनश्याम नवघडे नागभीडनागभीड येथे नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या परस्परविरोधी कार्यक्रमांमुळे येथील नागरिक चांगलेच संभ्रमात सापडले आहेत.नागभीडसह परिसरातील सहा सात गावे मिळून नगरपरिषद स्थापन करण्यासंदर्भातील अधिसूचना नगरविकास मंत्रालयाने १५ जून रोजी प्रसिद्ध केली. या अधिसूचनेनुसार १४ जुलै ही शेवटची आक्षेपाची तारीख आहे. असे असे असले तरी राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यात नागभीडसह नागभीड नगरपरिषदेत समावेश होऊ घातलेल्या अन्य ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. यामुळेच लोकांचा संभ्रम आणखीच वाढला आहे.नगरविकास मंत्रालयाने नगरपरिषदेची अधिसूचना प्रसिद्ध केली असली तरी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार येथील तहसील प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले आहे. नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ४ आॅगस्ट रोजी होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व प्रक्रियेला लवकरच आरंभ होणार आहे. प्रस्तावित नागभीड परिषदेला काही गावांनी विरोध दर्शविला असल्याने नगरपरिषदेची स्थापना काही अंशी वांद्यात आली असली तरी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका धोरणात्मक निर्णयानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणाला नगरपंचायतीचा दर्जा मिळणारच आहे.नागभीड नगर परिषद जरी झाली नाही तरी नगरपंचायत होणार हे निश्चीत आहे. आणि म्हणूनच ज्या संभावित नगरपंंचायती किंवा नगरपरिषदा आहेत, त्यांना या निवडणूक कार्यक्रमातून वगळण्याची गरज आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतीसाठी इच्छुक असणारे लोक निवडणुकीसाठी नामांकन भरतील. प्रचार करतील यात लोकांचा पैसा निश्चितच खर्च होणार आहे. एवढेच नाही तर शासकीय पातळीवर प्रशासनही कामाला लागेल. यात ई.व्ही.एम. मशीन जुळवाजुळव, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण त्यांचे मानधन व इतर बाबींवर लाखो रुपयांचा खर्च होणार, हे अटळ असून या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर नगरपरिषद किंवा नगरपंचायतीची घोषणा होणार. यामुळे लोकांच्या आणि प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार, हे निश्चित आहे. अगदी चार महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुकास्थळी असेच झाले. राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार या तालुक्यास्थळांचा नगरपंचायतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच निवडणूक आयोगाने तेथील ग्रामपंचाययतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सर्व प्रक्रिया पार पाडली आणि ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी नगरपंचायतीची अधिसूचना जारी करुन ग्रामपंंचायत निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली.गडचिरोलीत जे झाले ते नागभीडबाबत होऊ नये. लोकांच्या आणि प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी फेरु नये. लोकांच्या आणि शासनाच्या पैशाचा चुराडा होऊ नये. यासाठी नागभीड आणि नागभीड नगर परिषदेत समाविष्ट संभावित गावांची ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया तुर्त स्थगित ठेवावी, अशी मागणी आहे. ही शासकीय प्रक्रिया आहे. ती थांबू शकत नाही. नगरपरिषदेची ही प्रक्रिया सुरू आहे. १५ जुलैला आक्षेपाची मुदत संपत आहे. ग्रामपंंचायत निवडणुकीच्या अगोदर जे काही करता येईल. ते करण्याचा माझा प्रयत्न आहे.- कीर्तीकुमार भांगडिया,आमदार चिमूर.नेतेही संभ्रमातग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला की गावात राजकीय मंडळीत उत्साह संचारतो. गल्लीबोळात मोर्चेबांधणी सुरू होते. मात्र यावेळी नगरपालिकेची चर्चा असल्याने राजकीय नेतेमंडळीही संभ्रमात आहेत.