शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त महिलांनी रोखला ताडोबा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 18:41 IST

१५ महिला स्थानबद्ध : मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : शहरातील सुमित्रा नगर परिसरातील नागरिकांना मनपाच्या अमृत नळयोजनेचे पाणीच मिळत नसल्याने संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी १० वाजता खत्री महाविद्यालयासमोर ताडोबाचा मार्ग दोन तास रोखून धरला. या आंदोलनामुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी १५ महिलांना स्थानबद्ध करून काही वेळाने सोडून दिले.

महानगरपालिकेतर्फे अमृत योजनेंतर्गत तीन वर्षांपासून पाणीपुरवठा जोडणी सुरू आहे. पण, सुमित्रा नगर परिसरात जोडणी झाली नाही. या भागात पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याची समस्या तात्काळ निकाली काढावी, या मागणीसाठी प्रभागातील महिला एकत्र आल्या. त्यांनी खत्री महाविद्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करून ताडोबा मार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. पण, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दोन तासांनंतर ताडोबा मार्ग पूर्ववत सुरू झाला. सुमित्रा नगर परिसरात पाणीपुरवठा नियमित झाला नाही तर मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनात माजी नगरसेवक सुभाष कासनगोदूवार, मंजुश्री कासनगोदूवार, प्रज्ञा गंधेवार, वसंत धंदरे, विजय चिताडे, माया ऊईके, आशिष ताजने, रंजीत मातंगी, आशिष बोंडे, अभिषेक सिंग, ललिता बावनथडे, दीपा नागरीकर आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर