शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त महिलांनी रोखला ताडोबा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 18:41 IST

१५ महिला स्थानबद्ध : मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : शहरातील सुमित्रा नगर परिसरातील नागरिकांना मनपाच्या अमृत नळयोजनेचे पाणीच मिळत नसल्याने संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी १० वाजता खत्री महाविद्यालयासमोर ताडोबाचा मार्ग दोन तास रोखून धरला. या आंदोलनामुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी १५ महिलांना स्थानबद्ध करून काही वेळाने सोडून दिले.

महानगरपालिकेतर्फे अमृत योजनेंतर्गत तीन वर्षांपासून पाणीपुरवठा जोडणी सुरू आहे. पण, सुमित्रा नगर परिसरात जोडणी झाली नाही. या भागात पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याची समस्या तात्काळ निकाली काढावी, या मागणीसाठी प्रभागातील महिला एकत्र आल्या. त्यांनी खत्री महाविद्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करून ताडोबा मार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. पण, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दोन तासांनंतर ताडोबा मार्ग पूर्ववत सुरू झाला. सुमित्रा नगर परिसरात पाणीपुरवठा नियमित झाला नाही तर मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनात माजी नगरसेवक सुभाष कासनगोदूवार, मंजुश्री कासनगोदूवार, प्रज्ञा गंधेवार, वसंत धंदरे, विजय चिताडे, माया ऊईके, आशिष ताजने, रंजीत मातंगी, आशिष बोंडे, अभिषेक सिंग, ललिता बावनथडे, दीपा नागरीकर आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर