शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकाविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न शासनास्तरावरून केला जात आहे. जे नागरिक १९५१ ते १९७१ मधील पुरावा सादर करण्यास असमर्थ ठरतील, त्यांना विदेशी म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यामुळे या कायद्यास बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, मुस्लिम, ख्रिश्चन व अल्पसंख्यांक समाजाने विरोध दर्शवला आहे.

ठळक मुद्देहजारोंची उपस्थिती : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम, बहुजन समाज व अन्य संघटनांनी चंद्रपुरात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सदर मोर्चात अल्पसंख्याक समाजाचे हजारो नागरिक, महिला व मुले सहभागी झाले होते. दरम्यान, आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला पाठविले.केंद्र शासनाने अलिकडेच नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक संसदेत पारित केला. या विधेयकाला इतर राज्यात विरोध होत असतानाच चंद्रपुरातील मुस्लिम बांधव व अन्य संघटनांनी देखील विरोध दर्शविला आहे. दरम्यान, शुक्रवारी चंद्रपुरात या विधेयकाविरोधात मोर्चाचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक भागातून मुस्लिम बांधव व अन्य समाजातील बांधव गांधी चौक येथे जमा झाले. दुपारी २ वाजता गांधी चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी विविध घोषणांचे फलक मोर्चेकरांनी हातात घेतले होते. केंद्र सरकार व विधेयकाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न शासनास्तरावरून केला जात आहे. जे नागरिक १९५१ ते १९७१ मधील पुरावा सादर करण्यास असमर्थ ठरतील, त्यांना विदेशी म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यामुळे या कायद्यास बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, मुस्लिम, ख्रिश्चन व अल्पसंख्यांक समाजाने विरोध दर्शवला आहे. दरम्यान, आजच्या मोर्चादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण शहरभर चोख पोलीस बंदोबस्त कायम होता. शहरातील महात्मा गांधी मार्गावरून सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यानंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना सभेत मार्गदर्शन केले. शेवटी एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात अ‍ॅड. फरहत बेग, बळीराज धोटे, राजू झोडे, अ‍ॅड्. पारोमिता गोस्वामी, बाळू खोब्रागडे, विनोद सोनटक्के, डॉ. राकेश गावतूरे, अनवर अली, हबीब मेमन, अ‍ॅड. जावेद शेख, नाहीद हुसेन, रामजान, अजहर शेख, सोहेल शेख आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Muslimमुस्लीम