शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकाविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न शासनास्तरावरून केला जात आहे. जे नागरिक १९५१ ते १९७१ मधील पुरावा सादर करण्यास असमर्थ ठरतील, त्यांना विदेशी म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यामुळे या कायद्यास बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, मुस्लिम, ख्रिश्चन व अल्पसंख्यांक समाजाने विरोध दर्शवला आहे.

ठळक मुद्देहजारोंची उपस्थिती : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम, बहुजन समाज व अन्य संघटनांनी चंद्रपुरात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सदर मोर्चात अल्पसंख्याक समाजाचे हजारो नागरिक, महिला व मुले सहभागी झाले होते. दरम्यान, आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला पाठविले.केंद्र शासनाने अलिकडेच नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक संसदेत पारित केला. या विधेयकाला इतर राज्यात विरोध होत असतानाच चंद्रपुरातील मुस्लिम बांधव व अन्य संघटनांनी देखील विरोध दर्शविला आहे. दरम्यान, शुक्रवारी चंद्रपुरात या विधेयकाविरोधात मोर्चाचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक भागातून मुस्लिम बांधव व अन्य समाजातील बांधव गांधी चौक येथे जमा झाले. दुपारी २ वाजता गांधी चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी विविध घोषणांचे फलक मोर्चेकरांनी हातात घेतले होते. केंद्र सरकार व विधेयकाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न शासनास्तरावरून केला जात आहे. जे नागरिक १९५१ ते १९७१ मधील पुरावा सादर करण्यास असमर्थ ठरतील, त्यांना विदेशी म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यामुळे या कायद्यास बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, मुस्लिम, ख्रिश्चन व अल्पसंख्यांक समाजाने विरोध दर्शवला आहे. दरम्यान, आजच्या मोर्चादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण शहरभर चोख पोलीस बंदोबस्त कायम होता. शहरातील महात्मा गांधी मार्गावरून सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यानंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना सभेत मार्गदर्शन केले. शेवटी एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात अ‍ॅड. फरहत बेग, बळीराज धोटे, राजू झोडे, अ‍ॅड्. पारोमिता गोस्वामी, बाळू खोब्रागडे, विनोद सोनटक्के, डॉ. राकेश गावतूरे, अनवर अली, हबीब मेमन, अ‍ॅड. जावेद शेख, नाहीद हुसेन, रामजान, अजहर शेख, सोहेल शेख आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Muslimमुस्लीम