शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

14 वर्षानंतर शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातंर्गत गोवरी परिसर कोळसा खाणींने वेढला आहे. त्यामुळे भुजल पातळी झपाट्याने खाली जात असून पाणी टंचाईचे स्वरूप गंभीर होत आहे. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या कार्यकाळात बंधाऱ्याच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. तर माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सुभाष धोटे यांच्या कार्यकाळात बांधकामाला सुरुवात झाली. मात्र निधीअभावी बांधकाम रखडले.

ठळक मुद्देबंधाऱ्यांचे बांधकाम अंतिम टप्प्यात : तीनशे एकर जमीन ओलिताखाली येणार

  प्रकाश काळे    लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी येथील नाल्यावर १४ वर्षापूर्वी मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे बांधकाम निधीअभावी रखडले होते. मात्र शेतकऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याने सुधारीत अंदाजपत्रक तयार करुन ६७ लाखांचा निधी उपलब्ध झाला असून बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जवळपास तीनशे हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असून उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होण्याची आशा आहे.बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातंर्गत गोवरी परिसर कोळसा खाणींने वेढला आहे. त्यामुळे भुजल पातळी झपाट्याने खाली जात असून पाणी टंचाईचे स्वरूप गंभीर होत आहे. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या कार्यकाळात बंधाऱ्याच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. तर माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सुभाष धोटे यांच्या कार्यकाळात बांधकामाला सुरुवात झाली. मात्र निधीअभावी बांधकाम रखडले. माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे सुधारित बांधकामासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधी अंतर्गत स्थानिक लोकप्रतिनिधी पाठपुरावा केला. त्यानंतर अर्धवट बंधाऱ्याच्या सुधारित बांधकामासाठी लघु सिंचाई विभागाने ६७ लाखांचा अंदाजपत्रक तयार केला. व माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला. त्यानंतर बंधाऱ्याच्या सुधारित बांधकामाला सुरुवात झाली आहे. तब्बल १४ वर्षाच्या कालखंडानंतर बंधारा पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पामुळे जवळपास तीनशे एकर जमीन ओलिताखाली येईल, भुजलपातळीत वाढ होण्याची अशा व्यक्त होत आहे.  

कोळसा खाणींमुळे पाण्याची पातळी घटलीबल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील गोवरी, पोवनी, गोयेगोव, चिंचाली, साखरी, बाबापूर, सास्ती परिसरातील नाले दिवाळीनंतरच कोरडे पडत आहे. गोवरी गावालगतच मोठा नाला वाहतो वेकोलित मोठया प्रमाणावर पाण्याचा उपसा होत असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी झपाटयाने खाली गेली आहे .  

१४ वर्षापासून गोवरी बंधाऱ्यांचे बांधकाम रखडले होते. त्यासाठी अनेकदा सबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर ६७ लाखांचा निधी मंजूर झाला असून या बंधाऱ्यांचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.- सुनील ऊरकुडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती,

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प