शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

लेखा परीक्षणात अडली भिसीची पाणी पुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 1:00 AM

येथे १ कोटी ९९ लक्ष रुपये किंमतीची नवी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली असली तरी, चार वर्ष लोटूनसुद्धा जुन्या ५ कोटी ८० लक्ष रुपये किंमतीच्या योजनेचा लेखा परीक्षण अहवाल अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणीत रखडलेल्या, नव्या पूरक पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळणे कठीण आहे.

ठळक मुद्देपाणीप्रश्न : थ्री फेज एक्स्प्रेस फिडरचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : येथे १ कोटी ९९ लक्ष रुपये किंमतीची नवी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली असली तरी, चार वर्ष लोटूनसुद्धा जुन्या ५ कोटी ८० लक्ष रुपये किंमतीच्या योजनेचा लेखा परीक्षण अहवाल अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणीत रखडलेल्या, नव्या पूरक पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळणे कठीण आहे. त्यामुळे यावर्षीही पाणी समस्या निकाली लागल्याची शक्यता कमीच आहे.लेखा परीक्षण अहवाल जर जून महिन्यात शासनाला सादर झाला तरी त्याला मंजूरी मिळेपर्यंत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही योजना अधांतरीच राहील, अशी भिती व्यक्त केली जात आहे.१५ एप्रिल रोजी नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी भिसीच्या ग्राम पंचायत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. साहित्याची नासधूस करण्यात आली. पोलिसात ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अज्ञात नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर येथील लोकप्रतिनिधींना जाग आली आणि २६ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांनी भिसीच्या पाण्याच्या मुद्दा उपस्थित करत चर्चा घडवून आणली. मात्र अजूनतरी पाणी या समस्येवर कोणताही तोडगा निघाला नाही. एका वर्षापूर्वी भिसीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेला मंजुरी मिळाली असती, तर तात्काळ त्या योजनेतून भिसी पाणीपुरवठा योजनेसाठी धापरला तलावावर नवीन थ्री फेज एक्स्प्रेस फिडरची व्यवस्था करता आली असती. तलावावर २४ तास थ्री फेज वीज प्रवाह मिळाल्यास फिल्टर प्लांटला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा झाला असता. पण तो पर्याय सद्यातरी अशक्यप्राय असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या पाण्याची पातळी खालावली आहे. मे व जून महिन्यात पाणीसाठा आटण्याची शक्यता आहे. भिसीतच नव्हे तर सर्वत्र नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेळीच या समस्येकडे लक्ष दिले असते, तर ही समस्या आज उद्भवली नसती. ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील रक्कम यावर खर्च करणे अपेक्षित होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.भिसीच्या जुन्या ५ कोटी ८० लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची कंत्राटदारांची शिल्लक देयके याच महिन्यात अदा करण्यात आली असून लेखा परीक्षण अहवाल तयार करणे सुरु आहे. लेखा परीक्षणाचे काम किचकट असल्यामुळे हे काम मे महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण करण्यात येईल.त्यानंतर भिसीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या मंजुरीचा मार्ग मोकळा होईल.- आनंद भालाधरे ,डेप्युटी इंजिनिअर, जीवन प्राधिकरण, चंद्रपूर.एम.ए.सी.पी. योजने अंतर्गत न्यू फिडर एक्स्प्रेस करिता जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, चिमूर मार्फत प्रस्ताव सादर केला करण्यात आला आहे.- अनिरुद्ध शेंडे ,सचिव, ग्राम पंचायत,भिसी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWaterपाणी