शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तब्बल १७२ गावे हत्तीरोगाच्या सावटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

या रोगाचा प्रसार क्यूलेक्स डासाच्या मादीपासून होतो. डासाची मादी हत्तीरोगग्रस्त रोग्यास चावते. ती आपल्या सोंडेने शरीरातील रोगगंतु ओढून घेते. या रोगजंतुची वाढ डासाच्या शरीरात १०-१४ दिवसात होते. वाढ पूर्ण झाल्यावर ती मादी निरोगी माणसाला चावते. डास चावल्यानंतर दुषित अळी डासाने छिद्र केलेल्या जागेतून निरोगी मनुष्याच्या शरीरात प्रवेश करते, त्यानंतर त्वचेखालून आपला मार्ग आक्रमित लसीयुक्त ग्रंथीत व कालांतराने पूर्णवस्थेत येवून रूपांतर जंतूमध्ये होते.

ठळक मुद्देआरोग्य विभागासमोर आव्हान । संबंधित गावात राबविणार विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डासांपासून प्रसार होणाऱ्या आजारपैकी हत्तीरोग (फायलेरिया) हा एक महत्त्वाचा रोग आहे. या रोगाचे वैशिष्ट्ये असे की, ज्या माणसाच्या हातापायांवर अथवा गुप्तांगांवर सुज येत नाही, तोपर्यंत या रोगाची अजिबात कल्पना येत नाही. या रोगाने शरीर विकृत दिसू लागते व हत्तीरोग होतो. जिल्ह्यातील १७२ गावांमध्ये हा आजार होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने हत्तीरोगासाठी संवेदनशिल म्हणून जाहीर केली आहेत.या रोगाचा प्रसार क्यूलेक्स डासाच्या मादीपासून होतो. डासाची मादी हत्तीरोगग्रस्त रोग्यास चावते. ती आपल्या सोंडेने शरीरातील रोगगंतु ओढून घेते. या रोगजंतुची वाढ डासाच्या शरीरात १०-१४ दिवसात होते. वाढ पूर्ण झाल्यावर ती मादी निरोगी माणसाला चावते. डास चावल्यानंतर दुषित अळी डासाने छिद्र केलेल्या जागेतून निरोगी मनुष्याच्या शरीरात प्रवेश करते, त्यानंतर त्वचेखालून आपला मार्ग आक्रमित लसीयुक्त ग्रंथीत व कालांतराने पूर्णवस्थेत येवून रूपांतर जंतूमध्ये होते. मानवाचे शरीरात त्यांचे जीवनचक्र ६ ते ७ वर्षेही चालते. जंतुची वाढ रक्तात चालू असताना औषधोपचार केला तर ते नष्ट पावून मरतात व सुज येणे थांबते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या आजाराला १०० टक्के प्रतिबंध घालण्यासाठी येत्या २ ते २० मार्च २०२० पर्यंत विशेष मोहीम सुरू केले जाणार आहे. या कालावधीत विशेष मोहिमेतर्गत मिळणाºया डीईसी व अलबेंडॉझोल या गोळ्यांची एक मात्रा जेवणानंतरच जरूर घ्यावी. या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर ताप, डोकेदुखी, उलटी, जुलाब इत्यादी त्रास होण्याची शक्यता असते, त्यामुळे घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्या व कोणत्याही परिस्थितीत औषधोपचार थांबवू नका, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.हत्तीरोग (लिम्फॅटिक फायलेरीयासिस) या डासांपासून मनुष्याला होणारा आजार आहे. या आजारामुळे रुग्णाचे पाय (अवयव), वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णाला हालचाल करणेही अवघड होवून बसते. मायक्रोफायलेरिया नावाचे कृमी, डासांच्या चाव्याद्वारे निरोगी व्यक्तीच्या शरीरात संक्रमित होतात. हा रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. ज्यांच्या रक्तामध्ये मायक्रोफायलेरिया असतात, त्यांना दूषित रुग्ण असे म्हटल्या जाते. असे व्यक्ती हत्ती रोगाचे संसर्गस्त्रोत असतात. एकदा हत्तीरोग पूर्ण विकसीत झाला की नंतर मात्र त्या रुग्णांच्या रक्तामध्ये जंतू सापडणे कठीण असते. आतापर्यंतच्या तपासणीत जिल्ह्यात ११ हजार ८०० हत्तीरोग रूग्ण आढळले. ही संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याने आरोग्य प्रशासनाने मोहिमेची तयारी सुरू केली आहे.हत्तीरोगाची लक्षणेताप व कधी कधी थंडी वाजते.ताप ५ ते ९ दिवस राहतो.तीव्र स्नायू व सांधेदुधीचा त्रास होतो.रोगामुळे उग्र स्वरूपात वृषणाच्याआकारामध्ये वाढ होऊन हत्तीपाय होतो.हत्तीरोग प्रतिबंधासाठी मोहीम सुरू करण्याबाबत नियोजनाचे निर्देश दिले आहेत. २ ते २० मार्चपासून संबंधित यंत्रणा संवेदनशिल गावांमध्ये जाणार आहे.- जे.पी. लोंढे,अतिरिक्त जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :Healthआरोग्य