शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'शिक्षणा'साठी एक 'दानशूर' असाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 16:49 IST

Chandrapur : गावातील विद्यार्थ्यांवर इकडे-तिकडे भटकण्याची वेळ येऊ नये म्हणून बाखर्डी या लहानशा गावातील एका दानशूराने स्वमालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन दिली जिल्हा परिषदेला दान

चंद्रपूर : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. बाबासाहेबांचे विचार आपल्या गावातील नागरिकांनाही समोर नेऊ शकते. आपल्या गावातील प्रत्येक जण शिकला पाहिजे. शिक्षण घेऊन ते उच्चपदावर पोहोचले पाहिजे. यासाठी प्रत्येकांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांना इकडे-तिकडे भटकण्याची वेळ येऊ नये यासाठी कोरपना तालुक्यातील बाखर्डी या लहानशा गावातील एका दानशूराने स्वमालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन जिल्हा परिषदेला दान दिली. या जमिनीवर शाळा इमारत उभी असून आजपर्यंत शेकडो जणांनी शिक्षण घेत आपले जीवन सुकर केले आहे. बबन पांडुरंग मत्ते असे या दानशूराचे नाव असून ते ८८ वर्षांचे आहेत.

कोरपना तालुक्यातील भोयेगाव-गडचांदूर मार्गावर बाखर्डी हे गाव आहे. गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा होती. पुढील शिक्षणासाठी गावातील विद्यार्थ्यांना इतरत्र शिक्षण घ्यायला जावे लागायचे. ही खदखद गावातील बबन पांडुरंग मत्ते यांना सतावत होती. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना गावात दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांची सारखी धडपड सुरू होती. त्यांची ही धडपड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. यासाठी त्यांनी १९९१ ला जिल्हा परिषद प्रशासनाकडे विनंती केली आणि गावात ८ ते १० वीपर्यंत शाळा सुरू करण्याची मागणी केली. मात्र गावात असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये जागा अपुरी पडत असल्याची बाब अधिकाऱ्यांनी समोर केली. 

यावेळी मात्र त्यांनी कोणताही विचार न करता गावाच्या भल्यासाठी भोयेगाव- गडचांदूर मार्गावरील आपल्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन जिल्हा परिषद शाळेसाठी दान देण्याची तयारी केली. तयारी करूनच ते थांबले नाही तर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना जमीन दान देण्याचे संपूर्ण सोपस्कार पार पाडले. त्यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या हातात जमीन दान दिल्याचे कागदपत्र दिले. त्यानंतर मात्र गावात ८ ते १० वीची शाळेची इमारत बांधून त्यांच्या जागेवर शाळा सुरू करण्यात आली. आजपर्यंत या शाळेतून शेकडो विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन केले आहे. यातील अनेक जण विविध ठिकाणी मोठमोठ्या पदावर अधिकारी, कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तर काही डॉक्टर, वकीलसुद्धा झाले आहे. हे सर्व बघून बबन मत्ते यांना समाधान वाटत असले तरी सध्याची शाळेतील विद्यार्थ्यांची घटलेली संख्याही त्यांना फार सतावत आहे.

केवळ ज्ञानार्जनासाठीच व्हावा वापर■ दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांतील स्थिती बिकट होत आहे. बाखर्डी येथीलही शाळेतील विद्यार्थी संख्या सध्या घटली आहे. त्यामुळे भविष्यात ही शाळा बंद पडू नये, आपण ज्या उद्देशाने शाळेला जमीन दान दिली. तिचा उपयोग केवळ ज्ञानार्जना- साठीच व्हावा, अशी इच्छाही बबन मत्ते यांनी व्यक्त केली आहे.

खासगी शाळाही सुरू करता आली असती■ सामाजिक कार्याने झपाटलेल्या बबन मत्ते यांनी केवळ समाजासाठी काहीतरी करण्याचाच विचार केला. इतरांसारखी त्यांनीही शाळा सुरू करून स्वतःचे नाव करता आले असते, अनेकांना त्या शाळेत नोकरीसुद्धा लावता आली असती, मात्र मुळात सामाजिक कामच करण्याचा त्यांचा उद्देश असल्याने त्यांनी कोणत्याही भानगडीत पडण्याचा विचारसुद्धा केला नाही. आपल्या मालकीची गडचांदूर-भो- येगाव या रोडवरील जमीन दान देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन उभे केले.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरEducationशिक्षण