शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

५२ ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ८० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:40 PM

जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी आज सोमवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली.

ठळक मुद्देआज मतमोजणी : कुठेही अनुचित प्रकार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी आज सोमवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व तालुकेमिळून सरासरी ८० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी चिखले यांनी दिली.जिल्ह्यातील मूल, राजूरा, चंद्रपूर, भद्रावती, नागभीड, जीवती, वरोरा, पोंभुर्णा, चिमूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीत ही निवडणूक होत आहे. सोमवारी मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित गावांत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नागभीड तालुक्यातील चिखलगाव, गोविंदपूर, गिरगाव, मांगली आणि मिंथूर या पाच ग्रामपंचायतीमध्ये सरासरी ७९ टक्के, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, बामणी, कवडझई, इटोली आणि काटवली (बामणी) या पाच ग्रामपंचायतीसाठी सरासरी ६९ टक्के मतदान झाले.भद्रावती तालुक्यातील रानतळोधी विसलोन, गुंजाळा, टेकाडी, चिचोली, चारगाव, धानोली या सात ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ६९.९२ टक्के मतदान झाले. पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा झुल्लूरवार व बोर्डा बोरकर या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरासरी ८५ टक्के मतदान झाले. मूल तालुक्यातील उश्राळा चक, बेंबाळ, बोंडाळा खुर्द, आकापूर, गडीसुर्ला, बाबराळा आणि चकदुगाळा या सात ग्रामपंचायतींमिळून सरासरी ८२.५२ टक्के तर कोरपना तालुक्यातील बाखर्डी, कुकडसाथ, निमनी, कवठाला, गाडेगाव (विरुर), अंतरगाव, कोडशी, माथा, बोरगाव या नऊ ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान झाले.चिमूर तालुक्यातील सावरी (बिडकर), सोनेगाव (वन), रेंगाबोडी व आमडी (बेगडे) या चार ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८७.६० टक्के मतदान झाले.राजुरा तालुक्यातील देवाळा, हरदोना खुर्द, विरुर स्टेशन, डोंगरगाव या ग्रामपंचायतीसाठी एकूण सरासरी ७५ टक्के मतदान झाले. चंद्रपूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७८ टक्के तर जिवती तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी ८१ टक्के मतदान झाले.बॉक्सजिल्ह्यातील सर्व ५२ ग्रामपंचायतींमध्ये अतिशय शांततेत मतदान झाले. यातील ४१८ सदस्य व ४९ सरपंच पदासाठी एकूण १५०१ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांचे भाग्य आज मशीनबंद झाले. मंगळवारी सकाळी १० वाजता संबंधित तालुकास्थळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.वरोरा तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीमध्ये ९३ टक्के मतदान झाले.कोठारी येथे रात्रीपर्यंत चालले मतदानबल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये १ हजार १०१ मतदार आहेत. या मतदान केंद्रावर मतदारांनी दुपारी ४ वाजता पासून मतदानासाठी येण्यास सुरूवात केली.दरम्यान वीज पुरवठाही खंडित झाला. यामुळे मतदानाची वेळ सकाळी ७वाजता ते सायंकाळी ५.३० वाजता असूनही रात्री ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रीया सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिली.