शेतमाल तारण योजनेचा ५६ शेतकऱ्यांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:01:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत ...

शेतमाल तारण योजनेचा ५६ शेतकऱ्यांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत परिसरातील ५६ शेतकºयांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला आहे.
शासकीय योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी तारण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी शेतमाल आणून वखारमध्ये भरून ठेवल्या जातात. वाढत्या भावात माल विकल्या जातो. यावर्षी या योजनेत ५६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांना आर्थिक अडचण जाऊ नये, म्हणून शेतमाल आणल्यावर त्यावेळच्या बाजारभाव प्रमाणाच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम दिल्या जाते.
सदर कृषी उत्पन्न बाजार समितीत ५६ शेतकऱ्यांनी शेतमाल भरून ठेवला असता बाजार भाव वाढल्याने शेतमाल विक्री करणत आल्याने आर्थिक फायदा झाला. सदर योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळत असल्याने तालुक्यातील शेतकºयांनी शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष माधव बिरजे, सचिव घनश्याम ढोणे व संचालक मंडळांच्या सदस्यांनी केले आहे.
क्ंिवटलमागे ४३७ रुपयांचा फायदा
चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ५६ शेतकऱ्यांनी तीन हजार ३०१ क्विंटल शेतमाल तारण ठेवला होता. तारण शेतमाल प्रति क्विंटल सरासरी ४३७ रुपये नफा झाला. खर्च वजा जाता १५ लाख ३० हजार रुपयांचा लाभ मिळाला असून ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आली.