शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

नागपूर विभागातील ३७ हजार पाणी नमुने अद्याप तपासणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 07:00 IST

यंदा लॉकडाऊनमुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला नागपूर विभागातील ३७ हजार पाण्याचे नमुने अद्याप तपासता आले नाही. त्यामुळे जलजन्य आजार वाढण्याची भीती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात उद्भवणार जलजन्य आजारांचा धोकालॉकडाऊनचा अडसर

लोकमत न्यूज नेटवर्कराजेश मडावीचंद्रपूर : आदिवासी व ग्रामीण भागात पावसाळ्यात जलजन्य आजार उद्भवू नये, याकरिता राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी मे महिन्यात विभागनिहाय पाण्याचे नमुने तपासण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला नागपूर विभागातील ३७ हजार पाण्याचे नमुने अद्याप तपासता आले नाही. त्यामुळे जलजन्य आजार वाढण्याची भीती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.राज्यातील पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागात दरवर्षी एकून सार्वजनिक जलस्त्रोत, पाण्याचे नमुने आणि नमुने तपासणीचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. त्यासाठी राज्याचा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा सर्व जिल्ह्यातील पाणी तपासणी प्रयोग शाळांकडे जबाबदारी सोपविते. गतवर्षीच्या सर्वेक्षणानुसार राज्यातील सहा विभागात २ लाख १२ हजार ६१४ सार्वजनिक जलस्त्रोतांची नोंद करण्यात आली. यातील १ लाख ५० हजार १६ पाणी नमुन्यांची तपासणी शिल्लक आहे. नागपूर विभागात ७१ हजार ७३ जलस्त्रोत असून ३६ हजार ५६६ पाण्याचे नमुने मे २०२० पर्यंत तपासणीचे नियोजन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केले होते. त्यातील ३० हजार ४०० नमुने तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, लॉकडाऊन लागू झाल्याने ३७ हजार ७२ नमुन्यांची अद्याप तपासणीच होऊ शकली नाही. पाण्याचे नमुने तपासण्यात मागे पडलेल्या औरंगाबाद विभागानंतर नागपूर विभागाचा दुसरा क्रमांक आहे.पाणी तपासणीचे कारण?भूजलक्षेत्रात काम करणारे नियोजक, धोरण आखणाºया निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच भूजल क्षेत्रात संशोधन व विकास साधणाºया यंत्रणांना पाण्याबाबत सर्वकष माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा भूजल विकासाशी निगडीत समस्यांना तोंड द्यावे लागते. पाण्याचे नमुने तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतस्तरावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित अहवाल अत्यंत उपयुक्त ठरतो. मात्र, कोरोनाचा कहर सुरू असताना ऐन पावसाळ्यात नागपूर विभागात यंदा नमुने तपासणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही.चंद्रपूरात मान्सूनपूर्व ११ हजार ५५१ नमुने संकलनचंद्रपूर जिल्ह्यात २०१९-२० मान्सूनकरिता १४ हजार ९७१ पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्ट होते. यापैकी प्राप्त झालेल्या १३ हजार २०६ नमुन्यांची तपासणी झाली. २००२०-२१ मान्सूनपूर्व १४ हजार ९७१ नमुन्यांचे उद्दिष्ट मिळाले होते. लॉकडाऊनच्या काळातही १३ हजार ५५१ नमुने प्राप्त करण्यात चंद्रपूर भूजल सर्वेक्षण विभागाला यश आले. मात्र, या नमुन्यांचे अद्याप विश्लेषण झाले नाही. ३० जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती चंद्रपूर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयाने दिली.जलस्त्रोतांच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. पावसाळ्यात विविध आजार होऊ नये, याकरिता सदर अहवालावरूनच विविध प्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील उर्वरित गावांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.-राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर

टॅग्स :Waterपाणी