शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’साठी चंद्रपुरातून दोन हजारांवर कार्यकर्ते वाशिमच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 18:06 IST

जाती-धर्मात निर्माण केलेली दरी मिटविण्यासाठी राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा; विजय वडेट्टीवार

चंद्रपूर :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काढलेल्या ‘भारत जोडो’ पदयात्रेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून ट्रॅव्हल्स व अन्य वाहनांद्वारे दोन हजारांवर कार्यकर्ते सोमवारी चंद्रपुरातून रवाना झाले. चंद्रपूरहून रवाना झालेल्या वाहनांना काँग्रेस नेते माजी बहुजन कल्याण मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा झेंडा दाखविला. ही मंडळी मंगळवार, दि. १५ रोजी वाशिम येथून पदयात्रेत सहभागी होणार आहेत. वाशिम आणि पातूर अशा दोन ठिकाणी या मंडळींचा मुक्काम असणार आहे.

भाजप विकासाच्या नावावर मते मागतात आणि धर्माचे राजकारण करतात. जाती-धर्मात तेढ निर्माण केला जात आहे. देशाची मालमत्ता विकली जात आहे. चीनने घुसखोरी करून सुमारे २०० किमीचा भूभाग बळकावला आहे, अशी टीका आमदार वडेट्टीवार यांनी यावेळी केली. देश मजबूत करण्यासाठी, जाती-धर्मांमध्ये निर्माण केली जात असलेली दरी मिटविण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही भारत जोडो पदयात्रा काढलेली आहे. देशाची जनता एकत्र असली तरच विकास साधता येतो. या पदयात्रेवर काहींनी टीका केली. मात्र, विरोधकांचा हा प्रयत्न फसला आहे. त्यावर त्यांनाच जनतेकडून उलट प्रतिक्रिया मिळत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

या पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. विविध धर्मांतील मंडळी आपल्या परीने राहुल गांधी यांची पदयात्रेदरम्यान भेट घेत आहेत. यावरून भारत जोडो पदयात्रेचे महत्त्व अधोरेखित होणार आहे, याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, माजी शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, बल्लारपूर तालुकाध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, चित्रा डांगे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी का नाही केली ?

चित्रा वाघ यांनी चंद्रपुरात येऊन चंद्रपूरची दारूबंदी करण्याची मागणी केली आहे. त्या भाजपच्या महाराष्ट्राच्या नेत्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी का नाही केली ? त्यांना चंद्रपूरच्या दारूबंदीशी काय घेणे-देणे, असा सवाल यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच जगदंबा तलवार आणा; पण त्यासोबतच रोजगारही आणावा, असा टोला लगावत राज्यातील उद्योग गुजरातमध्ये गेल्याने ५ लाख बेरोजगारांचा रोजगार हातून गेला आहे, अशीही टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसchandrapur-acचंद्रपूरRahul Gandhiराहुल गांधी