शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’साठी चंद्रपुरातून दोन हजारांवर कार्यकर्ते वाशिमच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 18:06 IST

जाती-धर्मात निर्माण केलेली दरी मिटविण्यासाठी राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा; विजय वडेट्टीवार

चंद्रपूर :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काढलेल्या ‘भारत जोडो’ पदयात्रेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून ट्रॅव्हल्स व अन्य वाहनांद्वारे दोन हजारांवर कार्यकर्ते सोमवारी चंद्रपुरातून रवाना झाले. चंद्रपूरहून रवाना झालेल्या वाहनांना काँग्रेस नेते माजी बहुजन कल्याण मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा झेंडा दाखविला. ही मंडळी मंगळवार, दि. १५ रोजी वाशिम येथून पदयात्रेत सहभागी होणार आहेत. वाशिम आणि पातूर अशा दोन ठिकाणी या मंडळींचा मुक्काम असणार आहे.

भाजप विकासाच्या नावावर मते मागतात आणि धर्माचे राजकारण करतात. जाती-धर्मात तेढ निर्माण केला जात आहे. देशाची मालमत्ता विकली जात आहे. चीनने घुसखोरी करून सुमारे २०० किमीचा भूभाग बळकावला आहे, अशी टीका आमदार वडेट्टीवार यांनी यावेळी केली. देश मजबूत करण्यासाठी, जाती-धर्मांमध्ये निर्माण केली जात असलेली दरी मिटविण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही भारत जोडो पदयात्रा काढलेली आहे. देशाची जनता एकत्र असली तरच विकास साधता येतो. या पदयात्रेवर काहींनी टीका केली. मात्र, विरोधकांचा हा प्रयत्न फसला आहे. त्यावर त्यांनाच जनतेकडून उलट प्रतिक्रिया मिळत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

या पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. विविध धर्मांतील मंडळी आपल्या परीने राहुल गांधी यांची पदयात्रेदरम्यान भेट घेत आहेत. यावरून भारत जोडो पदयात्रेचे महत्त्व अधोरेखित होणार आहे, याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, माजी शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, बल्लारपूर तालुकाध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, चित्रा डांगे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी का नाही केली ?

चित्रा वाघ यांनी चंद्रपुरात येऊन चंद्रपूरची दारूबंदी करण्याची मागणी केली आहे. त्या भाजपच्या महाराष्ट्राच्या नेत्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी का नाही केली ? त्यांना चंद्रपूरच्या दारूबंदीशी काय घेणे-देणे, असा सवाल यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच जगदंबा तलवार आणा; पण त्यासोबतच रोजगारही आणावा, असा टोला लगावत राज्यातील उद्योग गुजरातमध्ये गेल्याने ५ लाख बेरोजगारांचा रोजगार हातून गेला आहे, अशीही टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसchandrapur-acचंद्रपूरRahul Gandhiराहुल गांधी